शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

केंद्राची स्मार्ट सिटी योजनाच बोगस : चव्हाण

By admin | Updated: October 24, 2015 01:21 IST

कॉँग्रेसची सभा : एकहाती सत्ता देण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही. ज्या शहरांची निवड झाली त्यांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात पक्षपातीपणा केला आहे. ही योजनाच खोटी, बोगस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शुक्रवारी रात्री क्रशर चौक येथे कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या शहरांची लोकसंख्या दहा हजार नाही, अशा शहरांचा या योजनेत समावेश केला असून, त्यांना मुंबईच्या बरोबरीने निधी दिला जाणार आहे. शिवाय योजनेद्वारे मिळणारा निधी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून खर्च करावयाचा आहे. महापौर, आयुक्तांना तेथे कोणतेही अधिकार असणार नाहीत. हा खासगीकरणाचा भाग आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून पश्चिम महाराष्ट्राकडे आकसाने पाहणे सुरू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कॉँग्रेस सरकारच्या काळात आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यामुळे येथे अनेक विकासाची कामे सुरू झाली आहेत. आता ही कामे पूर्णत्वाकडे न्यायची असतील तर सत्ता पुन्हा एकदा कॉँग्रेसच्या हाती सोपवा. राज्यात आणि देशात कॉँग्रेसने अनेक लोकप्रिय योजना सुरू केल्या होत्या. त्या भाजप सरकारने बंद केल्या आहेत. अनेक चांगल्या योजनांची नावे बदलली आहेत. योजना बंद केल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांना त्याचा फटका बसला. कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही अकराशे कोटींचा निधी आणला; म्हणूनच या योजना बंद न पडता त्या पूर्णत्वाकडे न्यायच्या असतील तर कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता आली पाहिजे. अल्पसंख्यांकाना जाळून मारून टाकले जात आहे; परंतु पंतप्रधान साधा खेदही व्यक्त करीत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर यांचे फोटोही त्यांच्या जाहीरनाम्यातून गायब झाले. त्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा कुठे चाललीय, हे दिसून येते, असेही ते म्हणाले. कोल्हापुरी बाणा दाखवाकोल्हापूर हे प्रगतीकडे जात असलेले शहर आहे. म्हणूनच महापालिका निवडणुकीत कोल्हापूरचा बाणा दाखवा. चुकून जरी भाजपच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न झाला तर कोल्हापूरवर हा मोठा अन्याय होईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) (पान / ३ वर)+तुमचे हात कोणीबांधले होते? माजी मंत्री सतेज पाटील यांनी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता दिली तर एक हजार कोटींचा निधी आणू, असे पालक मंत्री सांगत आहेत; पण गेल्या वर्षभरात निधी आणण्यासाठी तुमचे हात कोणी बांधले होते का? तुमच्या हातात सत्ता असताना शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करता आला नाही. त्यातूनच त्यांची मानसिकता दिसून आली. कोल्हापूरला केवळ पाने पुसण्याचे काम झाले. विमानतळाच्या विकासाकरिता काही केले नाही, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी दिला नाही. म्हणूनच आता मते मागायला येणाऱ्या भाजपला ‘कोल्हापूरला काय दिले?’ याचा जाब विचारा, असे आवाहन पाटील यांनी केले.