शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

केंद्रातूनच चालतो महाराष्ट्राचा कारभार!

By admin | Updated: March 2, 2015 01:51 IST

राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच

नाशिक : राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच गुरफटल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुसरीकडे केंद्राचा राज्यावर दबाव असल्याने विकास भरकटल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या अधिवेशनात ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा राज्यावर अंकुश आहे. मोदी म्हणतील तसे मुख्यमंत्री फडणवीस वागत असल्याने पूर्वीचे काँग्रेस आणि आताच्या भाजपा सरकारमध्ये कोणताच फरक नसल्याचे ते म्हणाले.राज्याच्या विकासाबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे कोणताही कार्यक्रम नाही. याचकरिता आम्ही सरकारला ब्लू प्रिंट दिली होती. नाशिक महापालिकेत आम्हाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर चर्चा होते. तिकडे मोदी पवारांचे गोडवे गातात, त्यांना कुणी जाब विचारत नाही. चार महिन्यांपूर्वी काका-पुतण्यांपासून महाराष्ट्राला वाचविण्याची भाषा करणारे मोदी आता पवारांना आपला राजकीय सल्लागार म्हणतात. आता हे कसे चालते? लालू-मुलायमच्या सोबत मोदी कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांना कुणी जाब विचारत नाही, असेही ते म्हणाले.दिल्लीत भाजपाचा पराभव झाला, केजरीवाल यांनी ‘काडकन’ वाजविली. मग पक्ष संपला म्हणून आमच्याविषयीच का चर्चा होते, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)