शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ठाणे-भिवंडी आठ पदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:55 IST

ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली. मंगळवारी मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. सातारा-कागल रस्ता सहापदरी करण्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही त्यांनी मान्यत दिली आहे.महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की ठाणे-भिवंडी आठपदरी रस्त्याच्या निविदा काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल व तीन महिन्यांत कामाला प्रारंभही होईल. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मदन एरावार, खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग वारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि मंत्रालय सचिव युद्धवीर सिंह मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्गासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभी ५०० कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. या कामासाठी केंद्र आणि महापालिका एक-एक हजार कोटी रुपये खर्च करतील.४५ हजार कोटींची कामे सुरू-बैठकीत टोल आणि टोलनाक्यांचा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर नितीन गडकरी यांनी सांगितले की, ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांत ६५ हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिलीआहे व त्यातील ४५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभही झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.कामे वेगात होणारकोल्हापूरचा कागल-सातारा मार्ग सहापदरी करण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील तांत्रिक विसंगतींनाही दूर केल्या आहेत. रस्त्याचे काम तीन महिन्यांत सुरू केले जाईल व निविदांचे काम महिन्याभरात पूर्ण केले जाईल. औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचे कामही मंजूर करण्यात येत असून प्रकल्पांची कामे वेगात पूर्ण होतील.