शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहांची स्मशानभूमी

By admin | Updated: August 30, 2015 02:12 IST

शीना बोरा हत्याकांडाआधी पेण तालुक्यातील गागोदे गावात तब्बल ६ बेवारस मृतदेह आढळले होते़ धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाही प्रकरणात मृतदेह कोणाचा, मृत्यू कसा झाला, हत्या

- जयंत धुळप,  अलिबागशीना बोरा हत्याकांडाआधी पेण तालुक्यातील गागोदे गावात तब्बल ६ बेवारस मृतदेह आढळले होते़ धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाही प्रकरणात मृतदेह कोणाचा, मृत्यू कसा झाला, हत्या होती का याचा तपासच झालेला नाही. तपास न करताच पोलिसांनी या मृतदेहांची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गागोदे गाव हे विनोबा भावे यांचे जन्मगाव आहे़ अहिंसावादी भावेंच्या गावात अशी हिंसक, गूढ व रहस्यमय कृत्ये घडत असल्याने स्थानिक अस्वस्थ झाले आहेत़ शीनाप्रमाणे पोलिसांनी याआधी सापडलेल्या बेवारस मृतदेहांची उकल करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील आणि गोगोद्यातील ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ते म्हणाले, गागोदे परिसरातच चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत यांच्या मालकीचे मोठे फार्म हाऊस होते. अलिकडेच ते त्यांनी विकले आहे. हे फार्महाऊस त्यांचे असताना आणि तेथे ते वास्तव्यास असताना या फार्म हाऊसमध्ये नेमके काय चालते, तेथे कोण येते, कोण जाते याचा काहीच पत्ता लागत नसे.एकाच दिवशी सापडले होते तीन मृतदेह१९८६ या एका वर्षात येथे तीन मृतदेह सापडले़ पोलिसांनी या तिन्ही मृतदेहांची नोंद बेवारस म्हणूनच केली़ या तथाकथीत बेवारस मृतांचा अंत्यविधी गागोद्याच्या स्मशानभूमीत झाला. या तिन्ही मृतदेहांचा खून झाला आहे किंवा नेमके काय झाले आहे, याची चौकशी पोलिसांनी केली नाही़ केवळ चौकशी केल्यावर फाईल बंद केल्याचे त्यावेळी पोलिसांनी सांगितले़ १९९२ २४ फेब्रुवारी १९९२ रोजी एकाच दिवशी तीन मृतदेह याच परिसरात सापडले होते़ ग्रामस्थांनी यांची माहिती दिल्यानंतर पोलीस तेथे आले. या मृतांचे कोणीही नातेवाईक घटनास्थळी किंवा पेण पोलीसांकडे आले नाहीत. परिणामी या देखील मृतांची नोंद बेवारस म्हणून पोलिसांनी केली़ तपासाविना याही मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली. २००२ दर्गावाडी या आदिवासी गावाजवळच्या जंगलात नोंव्हेबर महिन्याच्या आसपास एका मुलीला काही लोक जबरदस्तीने गाडीतून घेवून आले होते़ त्या मुलीला जबरदस्तीने गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला होता़ त्यावेळी ग्रामस्थांनी तेथे धाव घेतल्यावर गाडी चालकाने पळ काढला होता़ या घटनेच्या चार दिवसांनंतर एका तरुणीचा मृतदेह याच दर्गावाडीजवळच्या दरीत या ग्रामस्थांना सापडला होता़ त्या मुलीचा मृतदेह कुजला होता. परिणामी पोलीसांनी जागेवरच डॉक्टरांचा अहवाल घेतला़ त्यानंतर ग्रामस्थांना पंच म्हणून घेऊन तो मृतदेह तेथेच पूरुन टाकला़ तसेच पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून नोंद करून तपास थांबवल्याचे वैशीली पाटील यांनी सांगीतले.तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदनया संशयास्पद मृतदेहांचा तपास करावा यासाठी दिवाण यांनी रायगडच्या तत्कालीन पोलीस अधिक्षकांसोबत तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशींना दिले होते. विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त जोशी गागोद्यात आले तेव्हा हस्तलिखीत अर्ज त्यांना दिल्याची आठवण दिवाण सांगतात. नियमातील पळवाटशहरामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी मृत्यूचा वैद्यकीय दाखला अत्यावश्यक असतो. परंतू ग्रामपंचायत क्षेत्रात स्मशानात अंत्यविधी करताना अशा दाखल्याची गरज भासत नाही. याच पळवाटेचा फायदा घेत अंत्यसंस्कार करण्याचे हे कारस्थान असल्याची दाट शक्यता वैशाली पाटील यांनी व्यक्त केली आहे.