शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

‘सीसीआय’चा कापूस खरेदीला खो!

By admin | Updated: November 20, 2015 02:09 IST

दिवाळीही गेली; शेतक-यांना खरेदीची प्रतीक्षा.

राजरत्न सिरसाट/अकोला : राज्यात कापूस खरेदीला अद्याप म्हणावा तसा वेग आला नसून, खासगी बाजारात आतापर्यंत जवळपास १४ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला आहे. पणन महासंघाकडेही कापसाची आवक संथ गतीने असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे लक्ष भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीकडे लागले आहे; परंतु सीसीआयने कापूस खरेदीला खो दिल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. यावर्षी कापसाला प्रतिक्विंटल ४१00 रुपये भाव जाहीर झाला आहे. पणन महासंघाकडून हमीदरानुसार कापसाची खरेदी केली जात आहे. मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास महांसघाचा (नाफेड) उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केली; परंतु गतवर्षी केंद्र सरकारने नाफेडशी करार न केल्याने सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी सीसीआयचा उपअभिकर्ता म्हणून पणन महासंघ राज्यात कापूस खरेदी करीत आहे. गतवर्षी सीसीआयने देशात ३३५ व महाराष्ट्रात ७0 च्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करून, ८६.९0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. पणन महासंघाने ११५ खरेदी केंद्र सुरू केली होती. यावर्षी पणन महासंघाने २0 पेक्षा जास्त कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सीसीआय दिवाळीनंतर खरेदी सुरू करणार होते; परंतु सीसीआय देशभरातील त्यांच्या १४ प्रादेशिक कार्यालयांकडून कापूस उपलब्धतेची माहितीच गोळा करीत आहे. १४ पैकी ३ प्रादेशिक कार्यालयांनी खरेदी सुरू करण्यासाठीची अनुमती मागितली; तथापि महाराष्ट्रात अद्याप या विषयावर माहिती गोळा करणेच सुरू असल्याने कापूस खरेदीला सीसीआयकडून विलंब होत आहे. कापसाचे हमीदर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून कापूस खरेदी केल्या जात असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. सीसीआय थेट कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावीत, या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, प्रक्रियेसाठी लागणारा कापूस व उपलब्धता, यासाठी सीसीआयच्या देशातील १४ प्रादेशिक कार्यालयाकडून माहिती गोळा केली जात असून काही प्रादेशिक कार्यालयांनी कापूस खरेदीसंदर्भात माहिती पोहोचवली आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू होतील, असे सीसीआयचे महादेव कुंभार यांनी स्पष्ट केले.