शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

आज सीबीएसईच्या बारावीचा निकाल

By admin | Updated: May 28, 2017 01:56 IST

बारावीच्या परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण मे महिन्यात सातत्याने बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखांचे मेसेज फिरत असल्यामुळे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बारावीच्या परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण मे महिन्यात सातत्याने बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखांचे मेसेज फिरत असल्यामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले होते. मात्र आता बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल रविवार आॅनलाइन जाहीर होणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा संपल्या. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल लागतो. पण यंदा मे महिन्याच्या मध्यातच बारावीचा निकाल लागणार असे खोटे मेसेज सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरा सीबीएसई बोर्डाने रविवारी बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल रविवारी दुपारी १२ वाजता सीबीएसईच्या ६६६.१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल, ६६६.ूु२ी१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल ६६६.ूु२ी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी फक्त आॅनलाइन निकाल जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या प्रतीसाठी बोर्डाच्या कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन सीबीएसई बोर्डातर्फे करण्यात आले आहे. यंदा देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बसले होते. ३ हजार ५०३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एसएमएसचाही वापरइंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात आयसीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल सोमवार, २९ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ३ वाजता दोन्ही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल कळणार आहेत. दुसरीकडे शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची तारीख सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३० अथवा ३१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.