शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

विधानभवनातून

By admin | Updated: March 8, 2017 01:26 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत.

चर्चा पारदर्शकतेचीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराची हमी दिलीच आहे तर मग मुंबईतील रस्ते घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार का’असा सवाल करीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारदर्शकतेचा विषय छेडला. शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर घोटाळ्यांचे आरोप करताना आता पारदर्शक चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिले. काँग्रेसचे नसीम खान यांनी, वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा बाहेर काढताना पारदर्शक चौकशीची मागणी केली. एकूणच अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्याच दिवशी पारदर्शकता हा परवलीचा शब्द ठरला.

लक्षवेधी सभात्यागविधानसभेच्या आजच्या कामकाजात पाच लक्षवेधी सूचना होत्या. मात्र, त्यापैकी चारची उत्तरेच आलेली नसल्याने सगळ्याच लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्याचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ही संधी कशी सोडणार? त्यांनी तत्काळ सत्तापक्षावर हल्लाबोल केला. मंत्र्यांच्या या हलगर्जीपणाबद्दल त्यांना समज द्या, असा प्रकार होता कामा नये, असे ते म्हणाले. कामकाजाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मग विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. मंत्र्यांकडून वेळेत उत्तरे न आल्याने लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागत आहेत. ही गंभीर बाब आहे. यापुढे असे होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आपण आजच मंत्री कार्यालयांना दिलेले आहेत,असे अध्यक्ष बागडे यांनी सांगितले.

मुनगंटीवार-पाटील खडाजंगीभ्रूण हत्येच्या मुद्यावर सरकारतर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, ‘पंकजा मुंडे, दीपक सावंत हे संबंधित मंत्री सभागृहात असताना वित्तमंत्री का उत्तर देत आहेत. त्यांचे काम अर्थसंकल्प मांडण्याचे आहे. त्यावर, तुमच्याही काळात तसे घडत होते, सरकारची सामूहिक जबाबदारी म्हणून मी उत्तर दिलेले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. ‘ज्येष्ठ मंत्री म्हणून उत्तर देण्याचा त्यांना अधिकार आहे’ अशी मुनगंटीवार यांची पाठराखण अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली आणि वादावर पडदा टाकला.मात्र, या निमित्ताने आजी-माजी वित्तमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.

सोलापूरची किनारसोलापूरचे भाजपा समर्थित अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल काढलेल्या उद्गारावरुन विधान परिषदेचे कामकाज बंद पडले. सोलापूर महापालिकेत बहुमत आणि जिल्हा परिषदेत चांगले यश मिळूनही भाजपाचे मंत्री, आमदार परिचारक प्रकरणावरून अस्वस्थ आहेत. परिचारकांनी माफी मागितली तरी वाद पेटता ठेवला जात असल्याची भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली असल्याचे समजते. आता मुख्यमंत्री सभागृहात काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे.

- फिरस्ता