शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

विधानभवनातून

By admin | Updated: March 8, 2017 01:26 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत.

चर्चा पारदर्शकतेचीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराची हमी दिलीच आहे तर मग मुंबईतील रस्ते घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार का’असा सवाल करीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारदर्शकतेचा विषय छेडला. शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर घोटाळ्यांचे आरोप करताना आता पारदर्शक चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिले. काँग्रेसचे नसीम खान यांनी, वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा बाहेर काढताना पारदर्शक चौकशीची मागणी केली. एकूणच अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्याच दिवशी पारदर्शकता हा परवलीचा शब्द ठरला.

लक्षवेधी सभात्यागविधानसभेच्या आजच्या कामकाजात पाच लक्षवेधी सूचना होत्या. मात्र, त्यापैकी चारची उत्तरेच आलेली नसल्याने सगळ्याच लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्याचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ही संधी कशी सोडणार? त्यांनी तत्काळ सत्तापक्षावर हल्लाबोल केला. मंत्र्यांच्या या हलगर्जीपणाबद्दल त्यांना समज द्या, असा प्रकार होता कामा नये, असे ते म्हणाले. कामकाजाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मग विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. मंत्र्यांकडून वेळेत उत्तरे न आल्याने लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागत आहेत. ही गंभीर बाब आहे. यापुढे असे होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आपण आजच मंत्री कार्यालयांना दिलेले आहेत,असे अध्यक्ष बागडे यांनी सांगितले.

मुनगंटीवार-पाटील खडाजंगीभ्रूण हत्येच्या मुद्यावर सरकारतर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, ‘पंकजा मुंडे, दीपक सावंत हे संबंधित मंत्री सभागृहात असताना वित्तमंत्री का उत्तर देत आहेत. त्यांचे काम अर्थसंकल्प मांडण्याचे आहे. त्यावर, तुमच्याही काळात तसे घडत होते, सरकारची सामूहिक जबाबदारी म्हणून मी उत्तर दिलेले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. ‘ज्येष्ठ मंत्री म्हणून उत्तर देण्याचा त्यांना अधिकार आहे’ अशी मुनगंटीवार यांची पाठराखण अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली आणि वादावर पडदा टाकला.मात्र, या निमित्ताने आजी-माजी वित्तमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.

सोलापूरची किनारसोलापूरचे भाजपा समर्थित अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल काढलेल्या उद्गारावरुन विधान परिषदेचे कामकाज बंद पडले. सोलापूर महापालिकेत बहुमत आणि जिल्हा परिषदेत चांगले यश मिळूनही भाजपाचे मंत्री, आमदार परिचारक प्रकरणावरून अस्वस्थ आहेत. परिचारकांनी माफी मागितली तरी वाद पेटता ठेवला जात असल्याची भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली असल्याचे समजते. आता मुख्यमंत्री सभागृहात काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे.

- फिरस्ता