शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत : राणे

By admin | Updated: October 24, 2015 00:43 IST

अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले.

दोडामार्ग : पैशाने जर निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर नीलेश राणे कधीच पडला नसता. त्यामुळे अमुक पैसे आले, तमुक पैसे आले अशा अफवा पसरवित असतील, तर त्या अफवांना बळी पडू नका. कारण कोणत्याच निवडणुका पैशाने जिंकता येत नाहीत. निवडणुका जिंकायच्या असतील, तर घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचा सेवक म्हणून काम करा, असे आवाहन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.येथील दळवी कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, चंदू मळीक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद गवस आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राणेंनी सेना-भाजपा युतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात कोकणात सहज निधी येत होता. मात्र, आता अच्छे दिन दाखवणाऱ्या भाजपाने सत्तेत आल्यावर लोकांना बुरे दिन आणले. जिल्हा नियोजनच्या निधीला ४० टक्केची कात्री लावून हा निधी विदर्भाला नेण्याचे काम भाजपाने केले. कोकणात येणारा निधी बंद झाला. त्यामुळे इथली विकासकामे ठप्प झाली. इथल्या सेनेच्या पालकमंत्र्यांना तर खुळ लागलंय. ते समजतात पालकमंत्र्याची खुर्ची देवाने दिली. ही खुर्ची जरी देवाने दिली असली, तरी ती लोकांच्या सेवेसाठी आहे हे ते विसरले आहेत. या खुर्चीचा वापर ते मिरवण्यासाठी करीत आहेत. त्यामुळेच आज सेना-भाजपच्या विरोधात संपूर्ण वातावरण आहे. दोडामार्ग ते मंडणगड सगळीकडेच काँग्रेस-राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. मात्र, कोणीही गाफील राहता कामा नये. प्रत्येकाने घरोघरी संपर्क ठेवा आणि जनतेचे सेवक म्हणून काम करा, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)