शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

उतणार नाही, मातणार नाही...

By admin | Updated: May 23, 2015 01:05 IST

उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनांचे सोने केल्याशिवाय राहणार नाही,

कोल्हापूर : उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनांचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला देणारा ठराव भाजपा राज्य परिषदेत शनिवारी मांडण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत शनिवारी मांडण्यात यावयाच्या तीन ठरावांच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारचे अभिनंदन आणि राज्य सरकारचे अभिनंदन असे दोन ठराव आहेत. तिसऱ्या ठरावाद्वारे विविध राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारण्यासाठी ठोस प्रयत्न केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येणार आहे.फडणवीस सरकारचे अभिनंदन करतानाच्या ठरावात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. १९९०मधील निवडणुकीनंतर विधानसभेच्या कुठल्याच निवडणुकीत राज्यात एका पक्षाला स्वबळावर तर सोडाच युती करूनही १०० पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नव्हत्या. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून १००पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ताही स्थापन करण्यात यश आले, असे ठरावात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातीला सरकारच्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीचे प्रचंड कौतुक या ठरावात करण्यात आले आहे. सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचारमुक्त, गतिमान व पारदर्शी प्रशासन सरकारने दिले आहे, असे प्रशस्तीपत्र देताना या सरकारच्या अनेक निर्णयांचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. १५ वर्षांतील भ्रष्टाचारी व ढिसाळ कारभारामुळे राज्यावर तीन लाख कोटींपेक्षा अधिकचे कर्ज झाले, अशी टीकाही ठरावात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अभिनंदन ठरावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)