शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

उतणार नाही, मातणार नाही...

By admin | Updated: May 23, 2015 01:05 IST

उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनांचे सोने केल्याशिवाय राहणार नाही,

कोल्हापूर : उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनांचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला देणारा ठराव भाजपा राज्य परिषदेत शनिवारी मांडण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत शनिवारी मांडण्यात यावयाच्या तीन ठरावांच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारचे अभिनंदन आणि राज्य सरकारचे अभिनंदन असे दोन ठराव आहेत. तिसऱ्या ठरावाद्वारे विविध राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारण्यासाठी ठोस प्रयत्न केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येणार आहे.फडणवीस सरकारचे अभिनंदन करतानाच्या ठरावात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. १९९०मधील निवडणुकीनंतर विधानसभेच्या कुठल्याच निवडणुकीत राज्यात एका पक्षाला स्वबळावर तर सोडाच युती करूनही १०० पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नव्हत्या. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून १००पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ताही स्थापन करण्यात यश आले, असे ठरावात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातीला सरकारच्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीचे प्रचंड कौतुक या ठरावात करण्यात आले आहे. सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचारमुक्त, गतिमान व पारदर्शी प्रशासन सरकारने दिले आहे, असे प्रशस्तीपत्र देताना या सरकारच्या अनेक निर्णयांचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. १५ वर्षांतील भ्रष्टाचारी व ढिसाळ कारभारामुळे राज्यावर तीन लाख कोटींपेक्षा अधिकचे कर्ज झाले, अशी टीकाही ठरावात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अभिनंदन ठरावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)