शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

महापालिका बरखास्त करता येईल का..?

By admin | Updated: December 8, 2015 01:18 IST

न्यायालयाची सरकारला विचारणा : प्रतिज्ञापत्र सादर करा; मेनन यांच्या जागेचा वाद

कोल्हापूर : शेतजमिनीचे रूपांतर रहिवासी क्षेत्रात करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश देऊनही जर कोल्हापूर महानगरपालिका आदेश पाळत नसेल, तर मग महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ च्या ‘कलम ४५२’ प्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करता येईल का, अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. यासंबंधी चार आठवड्यांत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारीला होईल. महानगरपालिका क्षेत्रात शिवाजी विद्यापीठालगत असलेल्या वैभव सोसायटीजवळ रि.स.नं १२८/३/५ सी ही १ हेक्टर ४५ आर एवढी जागा याचिकाकर्त्या प्रीती विजय मेनन यांच्या मालकीची आहे. त्यांनी ही जागा रहिवास क्षेत्रात समाविष्ट करून द्यावी म्हणून महानगरपालिकेकडे मागणी केली होती, परंतु १९९९ च्या विकास आराखड्यात ही जमीन शेती तसेच ‘ना विकास क्षेत्र’ या विभागात आरक्षित दाखविली असल्याचे कारण देऊन महानगरपालिकेने त्यांची मागणी फेटाळली होती; परंतु प्रीती मेनन यांनी राज्य सरकारशी संपर्क साधून आपली जमीन बिगरशेती करून मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यावेळी राज्य सरकारने महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून या संबंधातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले होते. त्यावेळी ‘या जमिनीतील १० टक्के अतिरिक्त जागा सुविधा क्षेत्र म्हणून सोडावे’, अशी सूचना महानगरपालिकेने मेनन यांना केली होती; परंतु नियमानुसार १० टक्के जागा ‘सुविधा क्षेत्र’ म्हणून सोडू, पण अतिरिक्त जमीन देण्यास त्यांनी नकार दिला. एकीकडे राज्य सरकारचे निर्देश आणि दुसरीकडे मेनन यांनी जादा क्षेत्र सोडण्यास दिलेला नकार यामुळे काय तो निर्णय घ्यावा म्हणून नगर रचना विभागाने हा प्रस्ताव महासभेसमोर सादर केला होता. तो महासभेने अमान्य केला. महानगरपालिकेच्या निर्णयाविरुद्ध प्रीती मेनन यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकारचे आदेश न पाळणारी कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी केली होती. सोमवारी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली. त्यावेळी मेनन यांच्यावतीने अ‍ॅड. अभय नेवगी असोसिएटस्तर्फे युक्तिवादात वस्तुस्थिती मांडली, तर महानगरपालिकेचे वकील सुरेश कांबळे यांनी बाजू मांडली. सुनावणीनंतर राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे महानगरपालिका निर्णय घेत नसेल आणि सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करत नसेल तर महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ च्या ‘कलम ४५२’ प्रमाणे महानगरपालिका बरखास्त करता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. चार आठवड्यांत राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. ाता यावर पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार आहे. (प्रतिनिधी)