शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

एसटीचे चालक-वाहक उपोषण पुकारणार

By admin | Updated: October 3, 2016 05:39 IST

एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करतानाच त्यातील फेऱ्या अन्य आगारांत वर्ग करण्यात येत आहेत.

मुंबई : एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करतानाच त्यातील फेऱ्या अन्य आगारांत वर्ग करण्यात येत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांची यात फरफट होत असल्याने त्याला विरोध करत मुंबई सेंट्रल आगारातील एसटीच्या ३२0 चालक-वाहकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, येत्या ४ आॅक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. वाढलेली आगारे, त्यामुळे मनुष्यबळाबरोबरच देखभाल-दुरुस्तीचा होणाराही खर्च पाहता अनेक आगार तोट्यात असल्याचे कारण पुढे करत महामंडळाने सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे. यासाठी ३0 किलोमीटरच्या आत एकापेक्षा जास्त आगार असल्यास आणि १00पेक्षा कमी फेऱ्या असल्यास तसे आगार टप्प्याटप्प्याने बंद करून त्यांतील फेऱ्या अन्य आगारात वळत्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत ११ सातारा फेऱ्या या सातारा आगाराकडेही वर्ग करतानाच हैदराबाद, विजापूर, बार्शी, धुळे, मुक्ताईनगर, शिर्डी, अहमदनगर या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३२0 चालक-वाहकांपैकी २0८ चालक-वाहकांचे रजेचे अर्ज स्वीकारण्यात आले. या उपोषणाला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला आहे. कामगारांच्या आणि प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आहे. चालक-वाहकांनी रजेचे अर्ज दिले असून ते स्वीकारण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)