शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पुलांना झेपेना वाहतुकीचे ओझे

By admin | Updated: August 9, 2016 01:45 IST

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेमुळे पुलांची असणारी दुरवस्था समोर आली आहे. गावागावातील अशा धोकादायक पुलांची दुरुस्ती करणे तातडीने गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील अशा धोकादायक ठरणाऱ्या पुलांवर प्रत्यक्ष पाहणी करुन ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...बावडा : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नद्यांवरील पुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनावर भीतीचे दडपण जाणवत आहे. याबाबत प्रशासन मात्र अजूनही गाफिलच आहे. बावडा (ता. इंदापूर) भागातील सराटी येथील नीरा नदीवरील पुलाचे शंभर वर्षांनंतर सन १९९८-९९ ला पुनरुज्जीवन करण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही जड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला कंप फुटतात हीच वस्तुुस्थिती आहे. पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल आहे. त्याचबरोबर भीमा नदीवर असणारा बावडा-गाराकोले जोडणारा पूल आहे. या पुलाची निर्मिती सन २००४ साली झाली आहे. मात्र सातत्याने या पुलाकडे दुरुस्तीसाठी शासकीय पातळीवर कधीच प्रयत्न झाले नाहीत. (वार्ताहर)वालचंदनगर : वालचंदनगर-जंक्शन या मुख्य रस्त्यावर ४६ फाटा कालव्यावर बांधण्यात आलेला पूल जीर्ण झालेला असल्याने ढासळला आहे. दोन फूट खचल्याने येथे मोठ्या अपघाताला प्रवाशांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. अवजड वाहनांमुळे पूल हलत आहे. रस्त्यावर भेगा पडल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्वरित या मुख्य रस्त्यावरील पूल नवीन करण्यात यावा, अशी मागणी वालचंदनगर-जंक्शन येथून व प्रवाशांतून वेळोवेळी होत आहे. वालचंदनगर जंक्शन हा मुख्य रस्ता सतत वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून पुणे-सोलापूर, सांगली, सातारा, माळशिरस, शिंगणापूर, दहिवडी, जत, पंढरपूर या मुख्य मोठ्या शहरांना जाणाऱ्या बस गाड्या यांचा मुख्य रस्ता आहे. वालचंदनगर कंपनीच्या शेकडो टन जॉबची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. वालचंदनगर, कळंब येथे महाविद्यालये असल्याने हजारो विद्यार्थी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात. जर हा ४६ नीरा डाव्या कालव्यावरील पूल अचानक खचल्यास मोठ्या अपघाताला प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. पुलावर भेगा पडल्याने हा पूल झोपाळ्यासारखा हलतोय. त्यामुळे प्रवासी पुलावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नीरा डाव्या कालव्यावरील हा पूल खचल्याने रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत. पाटबंधारे विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरणार आहे. त्वरित हा पूल दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.(वार्ताहर)