शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुलांना झेपेना वाहतुकीचे ओझे

By admin | Updated: August 9, 2016 01:45 IST

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेमुळे पुलांची असणारी दुरवस्था समोर आली आहे. गावागावातील अशा धोकादायक पुलांची दुरुस्ती करणे तातडीने गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील अशा धोकादायक ठरणाऱ्या पुलांवर प्रत्यक्ष पाहणी करुन ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...बावडा : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नद्यांवरील पुलांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनावर भीतीचे दडपण जाणवत आहे. याबाबत प्रशासन मात्र अजूनही गाफिलच आहे. बावडा (ता. इंदापूर) भागातील सराटी येथील नीरा नदीवरील पुलाचे शंभर वर्षांनंतर सन १९९८-९९ ला पुनरुज्जीवन करण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली होती. तरीही जड वाहनांच्या वाहतुकीने पुलाला कंप फुटतात हीच वस्तुुस्थिती आहे. पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा एक महत्त्वाचा पूल आहे. त्याचबरोबर भीमा नदीवर असणारा बावडा-गाराकोले जोडणारा पूल आहे. या पुलाची निर्मिती सन २००४ साली झाली आहे. मात्र सातत्याने या पुलाकडे दुरुस्तीसाठी शासकीय पातळीवर कधीच प्रयत्न झाले नाहीत. (वार्ताहर)वालचंदनगर : वालचंदनगर-जंक्शन या मुख्य रस्त्यावर ४६ फाटा कालव्यावर बांधण्यात आलेला पूल जीर्ण झालेला असल्याने ढासळला आहे. दोन फूट खचल्याने येथे मोठ्या अपघाताला प्रवाशांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. अवजड वाहनांमुळे पूल हलत आहे. रस्त्यावर भेगा पडल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्वरित या मुख्य रस्त्यावरील पूल नवीन करण्यात यावा, अशी मागणी वालचंदनगर-जंक्शन येथून व प्रवाशांतून वेळोवेळी होत आहे. वालचंदनगर जंक्शन हा मुख्य रस्ता सतत वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून पुणे-सोलापूर, सांगली, सातारा, माळशिरस, शिंगणापूर, दहिवडी, जत, पंढरपूर या मुख्य मोठ्या शहरांना जाणाऱ्या बस गाड्या यांचा मुख्य रस्ता आहे. वालचंदनगर कंपनीच्या शेकडो टन जॉबची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. वालचंदनगर, कळंब येथे महाविद्यालये असल्याने हजारो विद्यार्थी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात. जर हा ४६ नीरा डाव्या कालव्यावरील पूल अचानक खचल्यास मोठ्या अपघाताला प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. पुलावर भेगा पडल्याने हा पूल झोपाळ्यासारखा हलतोय. त्यामुळे प्रवासी पुलावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नीरा डाव्या कालव्यावरील हा पूल खचल्याने रस्त्यावर भेगा पडलेल्या आहेत. पाटबंधारे विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरणार आहे. त्वरित हा पूल दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.(वार्ताहर)