शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

उर्वरित बंदरांवरील भार कमी होईल - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

सरकारतर्फे सागरी किनाऱ्यावर बंदरे विकसित करण्यात येत असतानाच मानखुर्द येथे नव्याने उभारण्यात येणारे योगायतन बंदर हे मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटीवरील भार हलका करेल, असा

मुंबई : सरकारतर्फे सागरी किनाऱ्यावर बंदरे विकसित करण्यात येत असतानाच मानखुर्द येथे नव्याने उभारण्यात येणारे योगायतन बंदर हे मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटीवरील भार हलका करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.योगायतन ग्रुपतर्फे मानखुर्द येथे उभारण्यात येणाऱ्या योगायतन बंदराच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासाला योगायतन बंदर हातभार लावेल. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेशी या बंदराची नाळ जोडली जाईल. दिघी-रोहा बंदराला या बंदराशी रेल्वेद्वारे जोडले जाईल; शिवाय उर्वरित बंदरांवरील आयात-निर्यातीचा भारही हलका होईल.डॉ. राजेंद्र सिंग या वेळी म्हणाले, देशाच्या पश्चिम क्षेत्रातील बंदरांचा भार हलका करण्यासाठी योगायतन बंदर साहाय्यकारी ठरेल. उद्योगधद्यांच्या विकासासाठी याचा हातभार लागणार असून, राज्याच्या आर्थिक वृद्धीसही याचा लाभ होईल. मानखुर्द येथे योगायतन बंदर विकसित होणार आहे. ठाणे खाडी रेल्वे पुलापासून हे बंदर जवळ आहे; तर जेएनपीटीपासून या बंदराचे अंतर १० सागरी मैल एवढे आहे. (प्रतिनिधी)