शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

बुलडाण्यात 'पार्थिनीयम’मुळे नागरिकांचा जीव धाक्यात!

By admin | Updated: September 2, 2016 17:31 IST

ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २ -  ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पार्थिनीयमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विविध आजारासह खाज सुटणे व असह्य वेदना होत आहेत त्यामुळे वेदनाग्रस्तांनी रूग्णालयात धाव घेतली आहे. या पार्थिनीयमचा धोका त्वचा रोग, मधुमेह झालेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाला असून अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात  पावसाळ्यापुर्वी साफसफाई करणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी पालिका प्रशासन किंवा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन
साफसफाईकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे गाव परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच आता ठिकठिकाणी गाजर गवताने डोके वर काढल्यामुळे गाव परिसराला पार्थिनीयमचा (गाजर गवतातील परागकण) धोका
निर्माण झाला आहे. अनेक नागरिक विविध त्वचा रोगाने त्रस्त झाले असून गाजर गवतामुळे निर्माण होणाºया पार्थिनीयमच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.
जिल्ह्यात  रस्त्याच्या दुतर्फा बाजूला गाजर गवताने थैमान घातले आहे. जवळपास तीन दशकापूर्वी दुष्काळामुळे भारतात अमेरिकेतून निकृष्ट दर्जाचा गहू मागविण्यात आला होता. या निकृष्ट दर्जाच्या गहू सोबत अनेक प्रकारच्या विषारी गवताचे बियाणे आले होते. त्यातील एक म्हणजे सर्वत्र ओळखले जाणारे गाजर गवत आहे. या गाजर गवताने सर्वच ठिकाणी थैमान घातले असून अनेकांना आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गाजर गवताच्या पार्थिनीयम या विषारी परागामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी सारखे आजार उद्भवत असून अंग लाल होवून खाज सुटत आहे; असे रुग्ण दररोज वाढत असून उपचारासाठी सामान्य रुग्णालयासह खाजगी हॉस्पीटलकडे धाव घेत आहेत. यासाठी परिसर स्वच्छ व गाजर गवताचे  निर्मूलन करणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
 
काय असते पार्थिनीयम
गाजर गवतामुळे निर्माण होणारा पार्थिनीयम हा विषारी पराग आरोग्यास हानिकारक असून त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना अ‍ॅलर्जी होते. या अ‍ॅलर्जीमुळे अंगावर सूज येणे, डोळे लाल होणे, चेहºयावर सूज व मुरुम येणे, अंग लाल होणे, खाज सुटणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अ‍ॅलर्जीग्रस्त व्यक्तीस भयंकर त्रास सहन करावा लागत असून  अनेक
व्यक्तींना अंग कशामुळे लाल होते, याचे कारण कळत नाही.
 
अंग लाल होणे, खाज सुटणे अशा त्रास होणाºया व्यक्तीसऔषधोपचाराशिवाय पर्याय नसतो. अशा अ‍ॅलर्जीग्रस्त व्यक्तीने गाजर गवताच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे, तसेच पार्थिनीयमचे लक्षणे आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय
अधिकाºयांशी संपर्क साधावा. - डॉ.पी.पी.पिंपरकर, जनरल फिजिशियन, बुलडाणा.