शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

बुलडाण्यात 'पार्थिनीयम’मुळे नागरिकांचा जीव धाक्यात!

By admin | Updated: September 2, 2016 17:31 IST

ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २ -  ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पार्थिनीयमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विविध आजारासह खाज सुटणे व असह्य वेदना होत आहेत त्यामुळे वेदनाग्रस्तांनी रूग्णालयात धाव घेतली आहे. या पार्थिनीयमचा धोका त्वचा रोग, मधुमेह झालेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाला असून अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात  पावसाळ्यापुर्वी साफसफाई करणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी पालिका प्रशासन किंवा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन
साफसफाईकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे गाव परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच आता ठिकठिकाणी गाजर गवताने डोके वर काढल्यामुळे गाव परिसराला पार्थिनीयमचा (गाजर गवतातील परागकण) धोका
निर्माण झाला आहे. अनेक नागरिक विविध त्वचा रोगाने त्रस्त झाले असून गाजर गवतामुळे निर्माण होणाºया पार्थिनीयमच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.
जिल्ह्यात  रस्त्याच्या दुतर्फा बाजूला गाजर गवताने थैमान घातले आहे. जवळपास तीन दशकापूर्वी दुष्काळामुळे भारतात अमेरिकेतून निकृष्ट दर्जाचा गहू मागविण्यात आला होता. या निकृष्ट दर्जाच्या गहू सोबत अनेक प्रकारच्या विषारी गवताचे बियाणे आले होते. त्यातील एक म्हणजे सर्वत्र ओळखले जाणारे गाजर गवत आहे. या गाजर गवताने सर्वच ठिकाणी थैमान घातले असून अनेकांना आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गाजर गवताच्या पार्थिनीयम या विषारी परागामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी सारखे आजार उद्भवत असून अंग लाल होवून खाज सुटत आहे; असे रुग्ण दररोज वाढत असून उपचारासाठी सामान्य रुग्णालयासह खाजगी हॉस्पीटलकडे धाव घेत आहेत. यासाठी परिसर स्वच्छ व गाजर गवताचे  निर्मूलन करणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
 
काय असते पार्थिनीयम
गाजर गवतामुळे निर्माण होणारा पार्थिनीयम हा विषारी पराग आरोग्यास हानिकारक असून त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना अ‍ॅलर्जी होते. या अ‍ॅलर्जीमुळे अंगावर सूज येणे, डोळे लाल होणे, चेहºयावर सूज व मुरुम येणे, अंग लाल होणे, खाज सुटणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अ‍ॅलर्जीग्रस्त व्यक्तीस भयंकर त्रास सहन करावा लागत असून  अनेक
व्यक्तींना अंग कशामुळे लाल होते, याचे कारण कळत नाही.
 
अंग लाल होणे, खाज सुटणे अशा त्रास होणाºया व्यक्तीसऔषधोपचाराशिवाय पर्याय नसतो. अशा अ‍ॅलर्जीग्रस्त व्यक्तीने गाजर गवताच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे, तसेच पार्थिनीयमचे लक्षणे आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय
अधिकाºयांशी संपर्क साधावा. - डॉ.पी.पी.पिंपरकर, जनरल फिजिशियन, बुलडाणा.