शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

बीएसयूपीप्रकरणी घरत, उगले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 03:27 IST

पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला नसताना बांधकाम केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय घरत व माजी शहरअभियंता पी. के. उगले अडचणीत आले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका बांधत असलेल्या बीएसयूपी-घरकुल प्रकल्प योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला नसताना बांधकाम केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय घरत व माजी शहरअभियंता पी. के. उगले अडचणीत आले आहेत. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची सुनावणी ६ आॅक्टोबरला होणार आहे. केंद्र सरकारच्या बीएसयूपी प्रकल्पांतर्गत शहरातील गरिबांसाठी घरकुले बांधण्याचे काम केडीएमसी हद्दीत सुरू आहे. या प्रकल्पाला डिसेंबर २००६ ला मंजुरी मिळाली. २००७ ला कामांच्या निविदा काढण्यात आल्या. जून २००८ मध्ये कामाचे कार्यादेश देण्यात आले. दरम्यान, २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्याने पर्यावरण विभागाचा ना-हरकत दाखला आवश्यक होता. त्यामुळे कचोरे आणि खंबाळपाडा परिसरांतील प्रकल्पाच्या कामासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक होती. परंतु, तेव्हा ती महापालिकेला मिळाली नव्हती. पर्यावरण विभागाच्या ना-हरकत दाखल्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरीय समित्यांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यात पाठपुरावा कमी पडल्याने हा दाखला मिळू शकला नाही. अखेर, काम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांत ते पूर्ण करणे अपेक्षित असल्याने प्रशासनाने यासंदर्भातील नियमांची पूर्तता न करता कचोरे आणि खंबाळपाडा प्रकल्पांतील इमारतींचे बांधकाम ना-हरकत दाखला न घेता केले. दरम्यान, याची गंभीर दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त सचिवांनी घेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाला केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रदूषण संरक्षण कायद्याचे कलम १५ आणि १६ चा भंग केल्याचा ठपका ठेवत बीएसयूपी प्रकल्पाचे प्रमुख घरत आणि तत्कालीन शहरअभियंता उगले यांच्याविरोधात कल्याण जिल्हा न्यायालयातील तिसऱ्या न्यायालयात हे फौजदारी गुन्हे दाखल केले. याप्रकरणी समन्स बजावल्याने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहावे लागले होते. शहर अभियंता उगले हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरोधात अनियमितताप्रकरणी याआधीच लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे. यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. तर, घरत यांना बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांची यादी बनवण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी आयुक्त रवींद्रन यांनी याआधी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)>घरतांकडून प्रतिसाद नाहीयासंदर्भात ‘लोकमत’ने घरत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर, उगले यांनी आपण या प्रकल्पाचे प्रमुख नाही. त्यामुळे आपला याच्याशी काहीही संबंध नाही. माझ्यावर दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात आपली बाजू मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.