शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

ब्रिटिशकालीन ‘जागले’ आताचे कोळी

By admin | Updated: October 31, 2016 05:05 IST

जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत.

विलास बारी,

जळगाव- जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत. कोळी पाणभरे व महादेव कोळींचे वास्तव्याच्या नोंदीसाठी राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शेकडो दस्तऐवज संकलित केले आहेत. ब्रिटिशकालीन जागले हेच खान्देशातील कोळी असल्याचा दावा त्यांनी या पुराव्यांच्या आधारे केला आहे. ब्रिटिशकाळात जागले कोण?ब्रिटिश राजवटीत १८७४ च्या कायद्यात कलम ६४(१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हिंदू भिल्ल, कोळी आणि महार यांना १९१७ मध्ये जागले म्हणून विधिवत नेमणुका दिेल्या होत्या. या नेमणुका जाती व धर्मावर आधारित सरकारोपयोगी कनिष्ट नोकरांना दिलेल्या होत्या. या नेमणुका तीन ते चार गावांसाठी असायच्या.काय होते कामाचे स्वरूप?जागले म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे रात्रीचा पहारा करणे, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे त्याचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवणे, पावलांवरून चोरांचा माग काढणे, गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना मदत करणे, तालुक्याच्या ठिकाणी वसुलीचे पैसे घेऊन जाणे, जमिनीच्या व हद्द निशाणांच्या वेळी गावकामगारांबरोबर जाणे, तसेच वेळप्रसंगी तराळांची कामे करण्याची जबाबदारी होती.कोळी, पाणकेंचा पाटील व कुलकर्णी वतनदारांकडे वावरब्रिटिशकाळात कोळी जागले हे अस्पृश्य गणले जात होते. त्यांचे पद वंशपरंपरागत असल्याने त्यांच्या पदाबाबत रोटेशन पद्धत सुरू झाली. तळबंदी, कोळी पाणके, कोळी मल्हार यांची कामेदेखील निश्चित केली होती. गावस्तरावर पाणके हे पाटील व कुलकर्णी यांच्याकडे कामे करीत होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना कनिष्ठ वतनदारांच्या निम्मे जमीन दिलेली होती.१८७९ या वर्षाच्या शैक्षणिक माहितीचे संकलनडॉ. श्रीधर साळुंखे यांनी यासाठी खान्देश गॅझेटियरचा अभ्यास करून ३१ मार्च १८७९ या वर्षाच्या शैक्षणिक अहवालाची माहिती काढली. जनगणनेच्या अहवालाच्या परीक्षणानुसार कोळी जमातीतील लोक हे प्रामुख्याने विविध उपजमातीत विभागलेले होते. त्यामुळे एक उपजमात दुसऱ्या उपजमातीपेक्षा श्रेष्ठ समजत होते. १९२१ मध्ये खान्देश व गुजरातसाठी साहायक जिल्हाधिकारी डब्ल्यू ए.अलकॉक यांनी जनगणना करण्यापूर्वी कोळी उपजमाती लक्षात येत नसल्याने, त्यांची नोंद कोळी (गुजरात) व कोळी (खान्देश) अशी करण्याची सूचना केली होती, हे डॉ. साळुंखे यांनी साधार पटवून दिले आहे.> संशोधनासाठी या दस्तऐवजांचा केला अभ्यास...डॉ. श्रीधर साळुंखे यांनी खान्देशातील कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तब्बल १६८ पानाचे दस्तऐवज तपासले आहेत. त्यात १८८० चे गॅझेटियर, २९ मे १९३३, २३ एप्रिल १९४२, १ नोव्हेंबर १९५०, २९ आॅक्टोबर १९५६, १ नोव्हेंबर १९६१ व १९७६ चा शासन निर्णय, १८७४ चा वंशपरंपरागत पद अधिनियम ३, जनगणना अहवाल १९०१, १९११, १९२१ व १९३१, जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या जमीन आदेशाच्या प्रती, जागल्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत या दस्तऐवजांचा अभ्यास केला आहे. डॉ. साळुंखे यांच्या संशोधनानंतर आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर दस्तऐवजांसह निवेदन देत, जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलछा, कोलघा व कोळी मल्हार यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी विनंती केली आहे.संशोधनासाठी यांचे मिळाले सहकार्यया संशोधनासाठी डॉ. श्रीधर साळुंखे यांना निवृत्त पोलीस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. भोकरीकर, अजय कोळी यांचे सहकार्य लाभले.