शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

ब्रिटिशकालीन ‘जागले’ आताचे कोळी

By admin | Updated: October 31, 2016 05:05 IST

जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत.

विलास बारी,

जळगाव- जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत. कोळी पाणभरे व महादेव कोळींचे वास्तव्याच्या नोंदीसाठी राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शेकडो दस्तऐवज संकलित केले आहेत. ब्रिटिशकालीन जागले हेच खान्देशातील कोळी असल्याचा दावा त्यांनी या पुराव्यांच्या आधारे केला आहे. ब्रिटिशकाळात जागले कोण?ब्रिटिश राजवटीत १८७४ च्या कायद्यात कलम ६४(१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हिंदू भिल्ल, कोळी आणि महार यांना १९१७ मध्ये जागले म्हणून विधिवत नेमणुका दिेल्या होत्या. या नेमणुका जाती व धर्मावर आधारित सरकारोपयोगी कनिष्ट नोकरांना दिलेल्या होत्या. या नेमणुका तीन ते चार गावांसाठी असायच्या.काय होते कामाचे स्वरूप?जागले म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे रात्रीचा पहारा करणे, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे त्याचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवणे, पावलांवरून चोरांचा माग काढणे, गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना मदत करणे, तालुक्याच्या ठिकाणी वसुलीचे पैसे घेऊन जाणे, जमिनीच्या व हद्द निशाणांच्या वेळी गावकामगारांबरोबर जाणे, तसेच वेळप्रसंगी तराळांची कामे करण्याची जबाबदारी होती.कोळी, पाणकेंचा पाटील व कुलकर्णी वतनदारांकडे वावरब्रिटिशकाळात कोळी जागले हे अस्पृश्य गणले जात होते. त्यांचे पद वंशपरंपरागत असल्याने त्यांच्या पदाबाबत रोटेशन पद्धत सुरू झाली. तळबंदी, कोळी पाणके, कोळी मल्हार यांची कामेदेखील निश्चित केली होती. गावस्तरावर पाणके हे पाटील व कुलकर्णी यांच्याकडे कामे करीत होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना कनिष्ठ वतनदारांच्या निम्मे जमीन दिलेली होती.१८७९ या वर्षाच्या शैक्षणिक माहितीचे संकलनडॉ. श्रीधर साळुंखे यांनी यासाठी खान्देश गॅझेटियरचा अभ्यास करून ३१ मार्च १८७९ या वर्षाच्या शैक्षणिक अहवालाची माहिती काढली. जनगणनेच्या अहवालाच्या परीक्षणानुसार कोळी जमातीतील लोक हे प्रामुख्याने विविध उपजमातीत विभागलेले होते. त्यामुळे एक उपजमात दुसऱ्या उपजमातीपेक्षा श्रेष्ठ समजत होते. १९२१ मध्ये खान्देश व गुजरातसाठी साहायक जिल्हाधिकारी डब्ल्यू ए.अलकॉक यांनी जनगणना करण्यापूर्वी कोळी उपजमाती लक्षात येत नसल्याने, त्यांची नोंद कोळी (गुजरात) व कोळी (खान्देश) अशी करण्याची सूचना केली होती, हे डॉ. साळुंखे यांनी साधार पटवून दिले आहे.> संशोधनासाठी या दस्तऐवजांचा केला अभ्यास...डॉ. श्रीधर साळुंखे यांनी खान्देशातील कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तब्बल १६८ पानाचे दस्तऐवज तपासले आहेत. त्यात १८८० चे गॅझेटियर, २९ मे १९३३, २३ एप्रिल १९४२, १ नोव्हेंबर १९५०, २९ आॅक्टोबर १९५६, १ नोव्हेंबर १९६१ व १९७६ चा शासन निर्णय, १८७४ चा वंशपरंपरागत पद अधिनियम ३, जनगणना अहवाल १९०१, १९११, १९२१ व १९३१, जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या जमीन आदेशाच्या प्रती, जागल्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत या दस्तऐवजांचा अभ्यास केला आहे. डॉ. साळुंखे यांच्या संशोधनानंतर आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर दस्तऐवजांसह निवेदन देत, जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलछा, कोलघा व कोळी मल्हार यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी विनंती केली आहे.संशोधनासाठी यांचे मिळाले सहकार्यया संशोधनासाठी डॉ. श्रीधर साळुंखे यांना निवृत्त पोलीस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. भोकरीकर, अजय कोळी यांचे सहकार्य लाभले.