शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन ‘जागले’ आताचे कोळी

By admin | Updated: October 31, 2016 05:05 IST

जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत.

विलास बारी,

जळगाव- जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत. कोळी पाणभरे व महादेव कोळींचे वास्तव्याच्या नोंदीसाठी राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शेकडो दस्तऐवज संकलित केले आहेत. ब्रिटिशकालीन जागले हेच खान्देशातील कोळी असल्याचा दावा त्यांनी या पुराव्यांच्या आधारे केला आहे. ब्रिटिशकाळात जागले कोण?ब्रिटिश राजवटीत १८७४ च्या कायद्यात कलम ६४(१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हिंदू भिल्ल, कोळी आणि महार यांना १९१७ मध्ये जागले म्हणून विधिवत नेमणुका दिेल्या होत्या. या नेमणुका जाती व धर्मावर आधारित सरकारोपयोगी कनिष्ट नोकरांना दिलेल्या होत्या. या नेमणुका तीन ते चार गावांसाठी असायच्या.काय होते कामाचे स्वरूप?जागले म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे रात्रीचा पहारा करणे, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे त्याचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवणे, पावलांवरून चोरांचा माग काढणे, गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना मदत करणे, तालुक्याच्या ठिकाणी वसुलीचे पैसे घेऊन जाणे, जमिनीच्या व हद्द निशाणांच्या वेळी गावकामगारांबरोबर जाणे, तसेच वेळप्रसंगी तराळांची कामे करण्याची जबाबदारी होती.कोळी, पाणकेंचा पाटील व कुलकर्णी वतनदारांकडे वावरब्रिटिशकाळात कोळी जागले हे अस्पृश्य गणले जात होते. त्यांचे पद वंशपरंपरागत असल्याने त्यांच्या पदाबाबत रोटेशन पद्धत सुरू झाली. तळबंदी, कोळी पाणके, कोळी मल्हार यांची कामेदेखील निश्चित केली होती. गावस्तरावर पाणके हे पाटील व कुलकर्णी यांच्याकडे कामे करीत होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना कनिष्ठ वतनदारांच्या निम्मे जमीन दिलेली होती.१८७९ या वर्षाच्या शैक्षणिक माहितीचे संकलनडॉ. श्रीधर साळुंखे यांनी यासाठी खान्देश गॅझेटियरचा अभ्यास करून ३१ मार्च १८७९ या वर्षाच्या शैक्षणिक अहवालाची माहिती काढली. जनगणनेच्या अहवालाच्या परीक्षणानुसार कोळी जमातीतील लोक हे प्रामुख्याने विविध उपजमातीत विभागलेले होते. त्यामुळे एक उपजमात दुसऱ्या उपजमातीपेक्षा श्रेष्ठ समजत होते. १९२१ मध्ये खान्देश व गुजरातसाठी साहायक जिल्हाधिकारी डब्ल्यू ए.अलकॉक यांनी जनगणना करण्यापूर्वी कोळी उपजमाती लक्षात येत नसल्याने, त्यांची नोंद कोळी (गुजरात) व कोळी (खान्देश) अशी करण्याची सूचना केली होती, हे डॉ. साळुंखे यांनी साधार पटवून दिले आहे.> संशोधनासाठी या दस्तऐवजांचा केला अभ्यास...डॉ. श्रीधर साळुंखे यांनी खान्देशातील कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तब्बल १६८ पानाचे दस्तऐवज तपासले आहेत. त्यात १८८० चे गॅझेटियर, २९ मे १९३३, २३ एप्रिल १९४२, १ नोव्हेंबर १९५०, २९ आॅक्टोबर १९५६, १ नोव्हेंबर १९६१ व १९७६ चा शासन निर्णय, १८७४ चा वंशपरंपरागत पद अधिनियम ३, जनगणना अहवाल १९०१, १९११, १९२१ व १९३१, जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या जमीन आदेशाच्या प्रती, जागल्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत या दस्तऐवजांचा अभ्यास केला आहे. डॉ. साळुंखे यांच्या संशोधनानंतर आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर दस्तऐवजांसह निवेदन देत, जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलछा, कोलघा व कोळी मल्हार यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी विनंती केली आहे.संशोधनासाठी यांचे मिळाले सहकार्यया संशोधनासाठी डॉ. श्रीधर साळुंखे यांना निवृत्त पोलीस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. भोकरीकर, अजय कोळी यांचे सहकार्य लाभले.