शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन ‘जागले’ आताचे कोळी

By admin | Updated: October 31, 2016 05:05 IST

जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत.

विलास बारी,

जळगाव- जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलघा व कोलछा म्हणजेच कोळी जागले, मल्हार कोळी आहेत. कोळी पाणभरे व महादेव कोळींचे वास्तव्याच्या नोंदीसाठी राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शेकडो दस्तऐवज संकलित केले आहेत. ब्रिटिशकालीन जागले हेच खान्देशातील कोळी असल्याचा दावा त्यांनी या पुराव्यांच्या आधारे केला आहे. ब्रिटिशकाळात जागले कोण?ब्रिटिश राजवटीत १८७४ च्या कायद्यात कलम ६४(१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हिंदू भिल्ल, कोळी आणि महार यांना १९१७ मध्ये जागले म्हणून विधिवत नेमणुका दिेल्या होत्या. या नेमणुका जाती व धर्मावर आधारित सरकारोपयोगी कनिष्ट नोकरांना दिलेल्या होत्या. या नेमणुका तीन ते चार गावांसाठी असायच्या.काय होते कामाचे स्वरूप?जागले म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे रात्रीचा पहारा करणे, गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे त्याचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवणे, पावलांवरून चोरांचा माग काढणे, गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांना मदत करणे, तालुक्याच्या ठिकाणी वसुलीचे पैसे घेऊन जाणे, जमिनीच्या व हद्द निशाणांच्या वेळी गावकामगारांबरोबर जाणे, तसेच वेळप्रसंगी तराळांची कामे करण्याची जबाबदारी होती.कोळी, पाणकेंचा पाटील व कुलकर्णी वतनदारांकडे वावरब्रिटिशकाळात कोळी जागले हे अस्पृश्य गणले जात होते. त्यांचे पद वंशपरंपरागत असल्याने त्यांच्या पदाबाबत रोटेशन पद्धत सुरू झाली. तळबंदी, कोळी पाणके, कोळी मल्हार यांची कामेदेखील निश्चित केली होती. गावस्तरावर पाणके हे पाटील व कुलकर्णी यांच्याकडे कामे करीत होते. त्याचा मोबदला म्हणून त्यांना कनिष्ठ वतनदारांच्या निम्मे जमीन दिलेली होती.१८७९ या वर्षाच्या शैक्षणिक माहितीचे संकलनडॉ. श्रीधर साळुंखे यांनी यासाठी खान्देश गॅझेटियरचा अभ्यास करून ३१ मार्च १८७९ या वर्षाच्या शैक्षणिक अहवालाची माहिती काढली. जनगणनेच्या अहवालाच्या परीक्षणानुसार कोळी जमातीतील लोक हे प्रामुख्याने विविध उपजमातीत विभागलेले होते. त्यामुळे एक उपजमात दुसऱ्या उपजमातीपेक्षा श्रेष्ठ समजत होते. १९२१ मध्ये खान्देश व गुजरातसाठी साहायक जिल्हाधिकारी डब्ल्यू ए.अलकॉक यांनी जनगणना करण्यापूर्वी कोळी उपजमाती लक्षात येत नसल्याने, त्यांची नोंद कोळी (गुजरात) व कोळी (खान्देश) अशी करण्याची सूचना केली होती, हे डॉ. साळुंखे यांनी साधार पटवून दिले आहे.> संशोधनासाठी या दस्तऐवजांचा केला अभ्यास...डॉ. श्रीधर साळुंखे यांनी खान्देशातील कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तब्बल १६८ पानाचे दस्तऐवज तपासले आहेत. त्यात १८८० चे गॅझेटियर, २९ मे १९३३, २३ एप्रिल १९४२, १ नोव्हेंबर १९५०, २९ आॅक्टोबर १९५६, १ नोव्हेंबर १९६१ व १९७६ चा शासन निर्णय, १८७४ चा वंशपरंपरागत पद अधिनियम ३, जनगणना अहवाल १९०१, १९११, १९२१ व १९३१, जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या जमीन आदेशाच्या प्रती, जागल्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत या दस्तऐवजांचा अभ्यास केला आहे. डॉ. साळुंखे यांच्या संशोधनानंतर आदिवासी टोकरे कोळी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर दस्तऐवजांसह निवेदन देत, जिल्ह्यातील कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलछा, कोलघा व कोळी मल्हार यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी विनंती केली आहे.संशोधनासाठी यांचे मिळाले सहकार्यया संशोधनासाठी डॉ. श्रीधर साळुंखे यांना निवृत्त पोलीस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. भोकरीकर, अजय कोळी यांचे सहकार्य लाभले.