शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हवाय मोकळा श्वास!

By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST

बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या

आज जागतिक बालकामगार दिन : उपराजधानीत दहा हजारावर बालकामगारनागपूर : बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार नागपुरात जवळपास ४५०० बालकामगार आहेत. परंतु विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नागपुरात सुमारे १० हजारावर बालकामगार असल्याची शक्यता वर्तविली आहे. कामगार कल्याण विभागातर्फे गेल्या वर्षभरात नागपुरात १० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात सहा मुले हॉटेलमध्ये काम करताना आढळून आली तर चार जण नक्षीकाम करण्याच्या उद्योगात होते. यापैकी एकाही बालकामगाराची सुटका झाली नाही. कोणत्याही संस्थेत, कंपनीत, आस्थापनेत किंवा घरगुती काम करणारा मुलगा हा १४ वर्षाखालील असल्यास त्याल बालकामगार असे म्हटले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालकामगार आहेत.प्रत्येक जिल्ह्यात कृतिदल बालमजुरीची प्रथा ही मानव विकास व राष्ट्रीय विकासाला घातक आहे. तिचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कृृतिदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिल २००६ साली तसा जी.आर. काढला. जिल्हाधिकारी हे या कृतिदलाचे प्रमुख असून उपसहायक कामगार आयुक्त हे सदस्य सचिव असतात. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच त्यात त्या विभागातील कार्यरत बालकामगारांशी निगडित, इच्छुक स्वयंसेवी संस्था हे सदस्य असतात. हॉटेल क्षेत्रात सर्वाधिक बालमजूर कोणत्या क्षेत्रात किती बालकामगार आहेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी नागपुरात सर्वाधिक बालकामगार हे हॉटेल उद्योगात गुंतले आहेत. याला प्रशासनासह अशासकीय संघटनाही दुजोरा देतात. कमी पगार अधिक काम आणि लहान मुले मुकाट्याने काम करीत असल्याने बालमजूर ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. यानंतर विटाभट्टी, अगरबत्ती उद्योग, लग्नसमारंभात दिवे घेऊन जाणे, कचरा वेचणे, फुले व शोभेच्या वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेसमध्ये कागद वेचणे, खाणीत काम करणे, सुपारी फोडणे, रिबीन तयार करणे, पानटपरी आणि घरगुती कामासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त शेती आणि विडी उद्योगातही मोठ्या प्रमाणावर बालमजूर काम करतात. आर्थिक दंड व तुरुंगवासही बालकामगार ठेवण्यात येऊ नयेत याबाबत अनेकदा कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु ते अदखलपात्र असल्याने कामगार कल्याण निरीक्षकामार्फत याचा तपास केला जातो. बालकामगारांसंबंधी असलेल्या विशेष कायद्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या संस्थेला दहा हजार रुपयापर्यंत दंड आणि त्याचा मालकाला तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा गुन्हा करताना आढळून आल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. परंतु हा कायदा अदखलपात्र असल्याने कामगार निरीक्षक स्वत: याबाबत तपास करून न्यायालयात तक्रार दाखल करतात. न्यायालयीन प्रक्रियेत विलंब होत असल्याने या कायद्याचा प्रभाव पडताना दिसून येत नाही. त्यामुळेच बाल न्याय अधिनियमनुसार बालकामगार ठेवणे हा दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.