शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

हवाय मोकळा श्वास!

By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST

बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या

आज जागतिक बालकामगार दिन : उपराजधानीत दहा हजारावर बालकामगारनागपूर : बालकामगार ही जागतिक समस्या आहे. नागपुरातही बालकामगारांची समस्या भीषण आहे. परंतु बालकामगारांची निश्चित आकडेवारी मात्र अजूनही उपलब्ध नाही. यशदातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार नागपुरात जवळपास ४५०० बालकामगार आहेत. परंतु विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नागपुरात सुमारे १० हजारावर बालकामगार असल्याची शक्यता वर्तविली आहे. कामगार कल्याण विभागातर्फे गेल्या वर्षभरात नागपुरात १० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात सहा मुले हॉटेलमध्ये काम करताना आढळून आली तर चार जण नक्षीकाम करण्याच्या उद्योगात होते. यापैकी एकाही बालकामगाराची सुटका झाली नाही. कोणत्याही संस्थेत, कंपनीत, आस्थापनेत किंवा घरगुती काम करणारा मुलगा हा १४ वर्षाखालील असल्यास त्याल बालकामगार असे म्हटले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालकामगार आहेत.प्रत्येक जिल्ह्यात कृतिदल बालमजुरीची प्रथा ही मानव विकास व राष्ट्रीय विकासाला घातक आहे. तिचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कृृतिदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिल २००६ साली तसा जी.आर. काढला. जिल्हाधिकारी हे या कृतिदलाचे प्रमुख असून उपसहायक कामगार आयुक्त हे सदस्य सचिव असतात. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच त्यात त्या विभागातील कार्यरत बालकामगारांशी निगडित, इच्छुक स्वयंसेवी संस्था हे सदस्य असतात. हॉटेल क्षेत्रात सर्वाधिक बालमजूर कोणत्या क्षेत्रात किती बालकामगार आहेत, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी नागपुरात सर्वाधिक बालकामगार हे हॉटेल उद्योगात गुंतले आहेत. याला प्रशासनासह अशासकीय संघटनाही दुजोरा देतात. कमी पगार अधिक काम आणि लहान मुले मुकाट्याने काम करीत असल्याने बालमजूर ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. यानंतर विटाभट्टी, अगरबत्ती उद्योग, लग्नसमारंभात दिवे घेऊन जाणे, कचरा वेचणे, फुले व शोभेच्या वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेसमध्ये कागद वेचणे, खाणीत काम करणे, सुपारी फोडणे, रिबीन तयार करणे, पानटपरी आणि घरगुती कामासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त शेती आणि विडी उद्योगातही मोठ्या प्रमाणावर बालमजूर काम करतात. आर्थिक दंड व तुरुंगवासही बालकामगार ठेवण्यात येऊ नयेत याबाबत अनेकदा कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु ते अदखलपात्र असल्याने कामगार कल्याण निरीक्षकामार्फत याचा तपास केला जातो. बालकामगारांसंबंधी असलेल्या विशेष कायद्यानुसार पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या संस्थेला दहा हजार रुपयापर्यंत दंड आणि त्याचा मालकाला तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा गुन्हा करताना आढळून आल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. परंतु हा कायदा अदखलपात्र असल्याने कामगार निरीक्षक स्वत: याबाबत तपास करून न्यायालयात तक्रार दाखल करतात. न्यायालयीन प्रक्रियेत विलंब होत असल्याने या कायद्याचा प्रभाव पडताना दिसून येत नाही. त्यामुळेच बाल न्याय अधिनियमनुसार बालकामगार ठेवणे हा दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.