शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

दारिद्र्याचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान

By admin | Updated: June 9, 2016 06:20 IST

घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे

ठाणे : घरी अठराविश्वे दारिद्रय, नाक्यानाक्यावर उभे राहून काम मागायचे. मिळाले, तर कधी दोन दिवस तर कधी दोन महिने बिगारी काम. पावसाळ््याच्या दिवसांत तर काम नसल्याने घरात नियमित चूल पेटेल तर शप्पथ. घराचे भाडे भरायलाही कधी कधी पैसेही नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि शिकण्याची आवड या जोरावर कळव्यातील जयभीमनगर येथील झोपडीत राहणाऱ्या गोविंदा राठोड या मुलाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के मिळवून यशाचे शिखर गाठले. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणाऱ्या कुटुंबीतील मुलाने मिळवलेले हे गुण पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ््यांत आनंदाश्रू तरळले. त्यांशिवाय त्यांच्याकडेही त्याला देण्याजोगे काही नाही. दहावीचा निकाल लागताच पास झालेल्या मुलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. पण पेढे सोडाच, घरी गोडधोड करुन आनंद व्यक्त करण्याची सुद्धा ऐपत नसलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांनी फक्त गोड शब्दांतच कौतुक करीत आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला. रोजंदारीवर वेठबिगारी करणाऱ्या गोविंदच्या आई-वडिलांना नाक्या-नाक्यावर उभे राहून रोज काम मिळवावे लागते. कधी १०० तर कधी २०० - २५० रूपये मिळतात. पावसाळा जवळ आल्याने आता दोघांचेही काम गेले आहे. काम नसेल तेव्हा कचरा वेचून जेमतेम पैसे जमा होतात. त्यावर त्यांचे घर चालते. पैसे नसतील तर घरी जेवणच बनतेच असेही नाही. त्याचे घरही भाड्याचे. वीज-पाण्याचे मिळून महिना दीड हजार रुपये त्यांना द्यावे लागतात. कधी कधी भाडे नाही दिले, तर मालक घराबाहेर हाकलतात. पावसाळ््यात तर वीजही नसते. जेव्हा काळाशार अंधार घर व्यापून उरलेला असतो, तेव्हा मिणमिणत्या दिव्यात गोविंदा अभ्यास करत असे. पावसाळ््यात घराचे छप्पर गळते. त्यामुळे रात्रभर झोपही सोडून घरच्यांसोबत तो पाणी उपसत बसायचा. अशा हलाखीच्या परिस्थितीत गोविंदाने दहावीचा अभ्यास केला. शाळेत अनेकदा तो उपाशी जायचा. शाळेत गेल्यावर त्याचे शिक्षक, मुख्याध्यापक त्याला जेवण देत. त्याच्या शैक्षणिक साहित्यांचाही खर्च त्यांनीच केला. गोविंदाचे आई वडिल जरी शिकले नसले तरी मुलासाठी ते मोठ्ठी स्वप्ने पाहताहेत. गोविंदाची आई त्याला अभ्यासाला पहाटे पाच वाजता उठवत असे. आर्थिक अडचणींमुळे पुढचे शिक्षण प्रश्न त्याच्यासमोर आहे. गोविंदाला आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे तो सांगतो. शाळेतर्फेत्याला पुढील आयुष्यात सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले.>शारदा विद्यामंदिराचा ज्ञानयज्ञ१९७७ सालापासून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शारदा विद्यामंदिर या शाळेत आश्रमशाळा, झोपडपट्टी राहणारे आणि अत्यंत गरीब कुटुंबातील मुले शिकायला येतात. घरात अठराविश्वे दारिद्रय असल्यामुळे शाळा मुलांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तकापर्यंत सगळे पुरवते. यामागे सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, हा उदात्त हेतू असल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापक सांगतात. शाळेचासुद्धा कधी नव्हे तो ८७.६९ टक्के निकाल लागल्याने हा दुग्धशर्करा योग असल्याचे त्यांनी सांगितले.