शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ अपप्रचार - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: December 9, 2014 11:25 IST

मुंबईच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे अपप्रचार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे केवळ अपप्रचार असून असा कोणताही हेतू नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  आज हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांकडे या मुद्यावर अपुरी माहिती असून ते केवळ त्याच आधारे आकांडतांडव करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. 
मुंबईच्या विकास प्रक्रियेत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी 
रविवारी दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीदरम्यान केली होती. मात्र हा प्रस्ताव म्हणजे मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई तोडण्याचा कोणताही डाव नसून हा केवळ अपप्रचार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील कोणताही प्रकल्प असो, त्याचे सर्व कायदे केंद्राशी संबंधित असल्याने लहान किंवा मोठ्या विकास प्रकल्पासाठी नेहमी केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी व मुंबईच्या हितासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच जे लोक या समितीला विरोध करतील, ते मुंबईच्या विकासाच्या विरोधात असतील अशी टीकाही त्यांनी केली.