शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक ( फोटो स्टोरी)

By admin | Updated: August 5, 2016 16:06 IST

शुक्रवार सकाळपासूनच मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले असून वाहतूक कोंडी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.  रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.  पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. 
 
तसेच मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही विस्कळीत झाली असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान  मुसळधार पावसाचा हवाई सेवेलाही फटका बसला असून दृश्यमानता कमी असल्याने विमानांचे उड्डाण अर्धा तास उशिराने होत आहे. 
 
परळ, दादर, वरळी, बोरीवली, कांदिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होत आहे.  पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागाच सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. 
 
पावसामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. जेव्हीएलआर, मुलूंड टोल नाका ते कांजूरमार्गावरही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तेथील वाहतूकही धिम्या गतीने सुरु आहे.
 
सखल भागात पाणी साचल्याने सायनपासून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 
सायन-दादर दरम्यान ट्रॅकवर चार ते पाच इंच पाणी जमा झाल्याने मध्य रेल्वेची गती आणखी मंदावली आहे. 
मुंबई आणि ठाणे परिसरात पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
 
 
 
( सर्व फोटो - सुशिल कदम आणि अतुल कासारे यांनी काढले आहेत.  )