शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
5
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
6
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
7
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
8
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
9
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
10
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
11
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
12
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
13
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
14
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
15
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
16
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
17
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
18
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
19
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
20
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

राणेंसाठी दिल्लीत खलबते

By admin | Updated: December 4, 2015 01:16 IST

विधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याविषयी दिल्लीत खलबते सुरू आहेत. राणे यांनीदेखील आपल्याला उमेदवारी दिली तर विचारपूर्वक निर्णय घेऊ, असे सांगितले; शिवाय मनसेची मते मिळविण्याची ताकद फक्त राणेंकडेच आहे हेही एक कारण त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेचे संख्याबळ आणि याआधीच्या निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट पाहता विद्यमान आमदार भाई जगताप यांना पुन्हा संधी देणे पक्षातील काही नेत्यांना जोखमीचे वाटत आहे. तर राणे पुन्हा सक्रिय राजकारणात आले तर आपले काय, अशी भीतीही काहींच्या मनात आहे. सध्या मुंबई महापालिकेत काँग्रेस ५१, राष्ट्रवादी १४, समाजवादी पक्ष ९ असे काँग्रेसच्या बाजूने ७४ एवढे संख्याबळ आहे. तर शिवसेना ७४, भाजपा ३१ अशी १०५ बेरीज भाजपा-सेनेच्या बाजूने आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ७६ मतांची गरज आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पहिल्या पसंतीत निघू शकतील, असा सत्ताधाऱ्यांचा होरा आहे. या सगळ्यात मनसेची २८ मते निर्णायक ठरू शकतात. जर राणे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर शिवसेना आणखी एक उमेदवार देईल आणि कोणत्याही परिस्थितीत राणे येणार नाहीत याची व्यवस्था करेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना पालिकेत उमेदवारी देण्याचे आश्वासन देत त्यांची मते फोडण्याचे राजकारणही शिवसेना खेळेल, असे सांगितले जात आहे.भाई जगताप आपल्यालाच उमेदवारी मिळेल याविषयी आश्वस्त असले तरी मागील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची ६ ते ७ मते फुटल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्याआधीच्या निवडणुकीतही काँग्रेसचे बहुमत असताना कमरुद्दीन मर्चंट यांना याच फुटीचा जोरदार फटका बसला होता. याहीवेळी जर काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट झाली तर मनसेची मते कामी येतील आणि काँग्रेस आपली जागा राखू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. राणेंचा विजय काँगे्रससाठी फायद्याचा असला तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राणेंचा विजय शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकतो.