शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पडिक जमीन ठरू शकते वरदान

By admin | Updated: December 5, 2014 00:42 IST

सिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.

‘नीरी’च्या संशोधकांचा दावा : शेवाळापासून जैवइंधननिर्मितीयोगेश पांडे - नागपूरसिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेवाळापासून जैवइंधननिर्मितीसाठी अशी जमीन वापरता येऊ शकते, असा दावा ‘सीएसआयआर-नीरी’ कडून (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इस्टिट्यूट) करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.पारंपरिक पद्धतीनुसार डिझेल तयार करण्याचे स्रोत मर्यादित आहेत. प्रचलित इंधनाची टंचाई व भाववाढ यांच्या पार्श्वभूमीवर या इंधनाला सशक्त पर्याय बनू शकणाऱ्या जैवइंधन किंवा बायोडिझेलनिर्मितीचे महत्त्व वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘नीरी’ने शेवाळापासून जैवइंधन तयार करण्यासाठी काही वर्षांअगोदर संशोधन सुरू केले होते. संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर हा प्रयोग यशस्वी झाला. यासंदर्भात ‘नीरी’ने पूर्ती पॉवर अ‍ॅन्ड शुगर लिमिटेड या संस्थेच्या सहकार्याने प्रकल्पदेखील कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात शेतकऱ्यांना याची लहान ‘मॉडेल’द्वारे माहिती देण्यात येत आहे. नेमकी प्रक्रिया, याचे फायदे व भविष्यातील आव्हाने सविस्तरपणे समजावून सांगण्यात येत आहेत. यासाठी ‘नीरी’च्या संशोधकांचे पथकच उपस्थित आहे. कशी होते इंधननिर्मिती?या संशोधनानुसार पाण्याची मोठी टाकी तयार करून शेवाळ तयार केले जाते. विशिष्ट रसायनांचा उपयोग केल्यानंतर शेवाळातील पेशींना एकमेकांपासून तोडण्यात येते. या शेवाळातून तेल काढल्यानंतर त्यावर प्रयोगशाळेत विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर जैवइंधन तयार होते. सुमारे १ किलो शेवाळापासून ३००-३५० मिली ‘बायोडिझेल’ सहज तयार होऊ शकते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीमध्ये हा प्रकल्प लावता येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे पाणी वाया जाण्याची भीती नसते. या प्रक्रियेतून तयार होणारे जैवइंधन नेहमीच्या ‘डिझेल’च्या तुलनेत महाग पडत असले तरी, भविष्यातील आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, असे मत ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले.