शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पडिक जमीन ठरू शकते वरदान

By admin | Updated: December 5, 2014 00:42 IST

सिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.

‘नीरी’च्या संशोधकांचा दावा : शेवाळापासून जैवइंधननिर्मितीयोगेश पांडे - नागपूरसिंचनाच्या अभावामुळे शेतीलाच पाणी पुरत नसताना पडिक जमिनीत काही उत्पादन घेण्याचा शेतकरी विचारही करीत नाही. परंतु हीच जमीन शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेवाळापासून जैवइंधननिर्मितीसाठी अशी जमीन वापरता येऊ शकते, असा दावा ‘सीएसआयआर-नीरी’ कडून (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इस्टिट्यूट) करण्यात आला आहे. रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.पारंपरिक पद्धतीनुसार डिझेल तयार करण्याचे स्रोत मर्यादित आहेत. प्रचलित इंधनाची टंचाई व भाववाढ यांच्या पार्श्वभूमीवर या इंधनाला सशक्त पर्याय बनू शकणाऱ्या जैवइंधन किंवा बायोडिझेलनिर्मितीचे महत्त्व वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘नीरी’ने शेवाळापासून जैवइंधन तयार करण्यासाठी काही वर्षांअगोदर संशोधन सुरू केले होते. संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर हा प्रयोग यशस्वी झाला. यासंदर्भात ‘नीरी’ने पूर्ती पॉवर अ‍ॅन्ड शुगर लिमिटेड या संस्थेच्या सहकार्याने प्रकल्पदेखील कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनात शेतकऱ्यांना याची लहान ‘मॉडेल’द्वारे माहिती देण्यात येत आहे. नेमकी प्रक्रिया, याचे फायदे व भविष्यातील आव्हाने सविस्तरपणे समजावून सांगण्यात येत आहेत. यासाठी ‘नीरी’च्या संशोधकांचे पथकच उपस्थित आहे. कशी होते इंधननिर्मिती?या संशोधनानुसार पाण्याची मोठी टाकी तयार करून शेवाळ तयार केले जाते. विशिष्ट रसायनांचा उपयोग केल्यानंतर शेवाळातील पेशींना एकमेकांपासून तोडण्यात येते. या शेवाळातून तेल काढल्यानंतर त्यावर प्रयोगशाळेत विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर जैवइंधन तयार होते. सुमारे १ किलो शेवाळापासून ३००-३५० मिली ‘बायोडिझेल’ सहज तयार होऊ शकते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीमध्ये हा प्रकल्प लावता येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे पाणी वाया जाण्याची भीती नसते. या प्रक्रियेतून तयार होणारे जैवइंधन नेहमीच्या ‘डिझेल’च्या तुलनेत महाग पडत असले तरी, भविष्यातील आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, असे मत ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले.