शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलायला हवी - राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2016 15:35 IST

शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 28 - शेतक-यांच्या शिवारातील मालाला अगदी कमी किंमत तर त्याच शेतमालासाठी ग्राहकांकडून चढया किंमती घेतल्या जातात. चार पैसे मिळविण्यासाठी शेतीमाल शेतक-यांनी बाजार समितीच्या बाहेर विकल्यास माथाडी संपाचा इशारा देतात. त्यामुळे केवळ शेतक-यांचे मरण होते. शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी. मात्र ती बदलली जात नाही. मग शेतक-यांना न्याय कसा मिळणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
 
लहू काळे यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, बाबू गंजेवार, नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, लहू काळे आदी उपस्थित होते. 
 
ग्राहक आणि व्यापा-यांना खुश करण्यासाठी दुबळ्या शेतक-यांचा बळी देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची झाली आहे. शेतीमाल खरेदी करताना सर्वच लोक घासाघीस करतात. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, राज्यकर्त्यांना काय बोलणार असंही राजू शेट्टी बोलले आहेत.
 
बाटलीबंद पाणी, शितपेय, चॉकलेट यांसारख्या गोष्टींना वाटेल ती किंमत मोजली जाते. सर्वांना  फक्त शेतीमालच स्वस्त हवा असतो. शेतीमाल पिकविण्यासाठी शेतक-यांना किती खर्च येतो, किती कष्ट करावे लागतात, याचा विचार कोणी करत नाही. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, सरकारला बोलून काय फायदा आहे. शेतक-यांच्या या परिस्थितीला फक्त त्यांचे नशिबच जबाबदार धरुन चालणार नाही, आपण सर्वच जण त्यासाठी जबाबदार आहोत, असे परखड मत शेट्टी यांनी व्यक्त केले.