शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलायला हवी - राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2016 15:35 IST

शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 28 - शेतक-यांच्या शिवारातील मालाला अगदी कमी किंमत तर त्याच शेतमालासाठी ग्राहकांकडून चढया किंमती घेतल्या जातात. चार पैसे मिळविण्यासाठी शेतीमाल शेतक-यांनी बाजार समितीच्या बाहेर विकल्यास माथाडी संपाचा इशारा देतात. त्यामुळे केवळ शेतक-यांचे मरण होते. शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी. मात्र ती बदलली जात नाही. मग शेतक-यांना न्याय कसा मिळणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
 
लहू काळे यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, बाबू गंजेवार, नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, लहू काळे आदी उपस्थित होते. 
 
ग्राहक आणि व्यापा-यांना खुश करण्यासाठी दुबळ्या शेतक-यांचा बळी देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची झाली आहे. शेतीमाल खरेदी करताना सर्वच लोक घासाघीस करतात. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, राज्यकर्त्यांना काय बोलणार असंही राजू शेट्टी बोलले आहेत.
 
बाटलीबंद पाणी, शितपेय, चॉकलेट यांसारख्या गोष्टींना वाटेल ती किंमत मोजली जाते. सर्वांना  फक्त शेतीमालच स्वस्त हवा असतो. शेतीमाल पिकविण्यासाठी शेतक-यांना किती खर्च येतो, किती कष्ट करावे लागतात, याचा विचार कोणी करत नाही. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, सरकारला बोलून काय फायदा आहे. शेतक-यांच्या या परिस्थितीला फक्त त्यांचे नशिबच जबाबदार धरुन चालणार नाही, आपण सर्वच जण त्यासाठी जबाबदार आहोत, असे परखड मत शेट्टी यांनी व्यक्त केले.