शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलायला हवी - राजू शेट्टी

By admin | Updated: May 28, 2016 15:35 IST

शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 28 - शेतक-यांच्या शिवारातील मालाला अगदी कमी किंमत तर त्याच शेतमालासाठी ग्राहकांकडून चढया किंमती घेतल्या जातात. चार पैसे मिळविण्यासाठी शेतीमाल शेतक-यांनी बाजार समितीच्या बाहेर विकल्यास माथाडी संपाचा इशारा देतात. त्यामुळे केवळ शेतक-यांचे मरण होते. शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी. मात्र ती बदलली जात नाही. मग शेतक-यांना न्याय कसा मिळणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
 
लहू काळे यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, बाबू गंजेवार, नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, लहू काळे आदी उपस्थित होते. 
 
ग्राहक आणि व्यापा-यांना खुश करण्यासाठी दुबळ्या शेतक-यांचा बळी देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची झाली आहे. शेतीमाल खरेदी करताना सर्वच लोक घासाघीस करतात. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, राज्यकर्त्यांना काय बोलणार असंही राजू शेट्टी बोलले आहेत.
 
बाटलीबंद पाणी, शितपेय, चॉकलेट यांसारख्या गोष्टींना वाटेल ती किंमत मोजली जाते. सर्वांना  फक्त शेतीमालच स्वस्त हवा असतो. शेतीमाल पिकविण्यासाठी शेतक-यांना किती खर्च येतो, किती कष्ट करावे लागतात, याचा विचार कोणी करत नाही. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, सरकारला बोलून काय फायदा आहे. शेतक-यांच्या या परिस्थितीला फक्त त्यांचे नशिबच जबाबदार धरुन चालणार नाही, आपण सर्वच जण त्यासाठी जबाबदार आहोत, असे परखड मत शेट्टी यांनी व्यक्त केले.