शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थी संख्येविषयी बोर्ड अनभिज्ञ

By admin | Updated: March 6, 2017 02:42 IST

दिव्यांग आणि विशेष विद्यार्थ्यांविषयी बोर्डाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही

मनोहर कुंभेजकर,मुंबई- दिव्यांग आणि विशेष विद्यार्थ्यांविषयी बोर्डाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षेला या विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय करणे शक्य नसल्याचा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केला आहे. बोर्ड दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी अनभिज्ञ असल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले आहेत. बारावीची परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा केंद्र बदलणे, मराठीचा पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर लीक होणे अशा कारणांमुळे मंडळ चर्चेत आहे. यापुढे जाऊन बारावीचे सात दिव्यांग विद्यार्थी परीक्षा केंद्रावरील असुविधांमुळे त्रस्त झाले आहेत. पण, या विद्यार्थ्यांना मदत करु शकणार नाही असे मंडळाचे सचिव चांदेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दिव्यांग विद्यार्थी जिद्दीने बारावीची परीक्षा देत आहेत. पण, त्यांना सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून सचिवांची असंवेदनशीलतेच्या परिसीमेचे दर्शन होत असल्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. वाणिज्य शाखेतली निशिल घोडके हा विद्यार्थी सेरेब्रल पाल्सी ग्रस्त असून व्हीलचेअरवरून तो परीक्षा केंद्रावर येतो. या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र एम. के. संघवी कनिष्ठ महाविद्यालय होते. ऐनवेळी हे केंद्र बदलून जुहू येथील कै. अनंत जनार्दन म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय त्याला परीक्षेसाठी पाठवण्यात आले. या महाविद्यालयात उद्वाहनाची सोय नाही. निशिलला पहिल्या मजल्यावरची खोलीत नंबर असल्याचे सांगितले. त्याच्यबरोबर अजून ६ दिव्यांग विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. त्यामुळे सर्वांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय तळमजल्यावर करावी अशी विनंती केली. पण, ही विनंती केंद्राने फेटाळली. एका दिव्यांग विद्यार्थ्याला चक्क प्राचार्यांच्या केबिन मध्ये परीक्षेचा पेपर लिहिण्यास बसवण्यात आले. त्यामुळे लेखनिकच्या मदतीने पेपर लिहिण्यास साहाजिकच या दिव्यांग विद्यार्थ्यावर दडपण आले होते. अन्य ६ दिव्यांग विद्यार्थ्यांची बसण्याची सोय पहिल्या मजल्यावर करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांना तर कमालीचा त्रास झाला. सहा विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांबरोबर परीक्षेला बसवले. दिव्यांग विद्यार्थी लेखनिकांना उत्तरे सांगत असताना अन्य विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी अन्य विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यांची बसण्याची वेगळी सोय करा असे सांगितले. पण, यालाही नकार देण्यात आला. या संदर्भात दिव्यांग विद्यार्थी याच्या पालकांनी मंडळाचे सचिव चांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता सचिवांनी अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास असमर्थता दर्शविली. तसेच दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांची यादी मंडळाकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे>परीक्षेसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांची सर्व माहिती प्रमाणपत्रांसह मंडळाला सादर केली जाते. शासकीय परिपत्रकानुसार दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याची व परीक्षेसाठी अधिक कालावधी देण्याची मुभा दिली जाते.