शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

१० वीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाकडून नुकसान

By admin | Updated: March 9, 2016 17:05 IST

पहिल्या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिले नसेल तर अर्धा गुण गुण कमी करावा ,अशा आशयाच्या सूचना देऊन बोर्ड विद्यार्थ्यांचे नुकसान करित आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य दहावी बोर्ड परीक्षेच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आलेल्या आहेत त्यातील पहिल्या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिले नसेल तर अर्धा गुण गुण कमी करावा ,अशा आशयाच्या सूचना देऊन बोर्ड विद्यार्थ्यांचे नुकसान करित आहेत, असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर भारती यांनी केले आहे.
मराठी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न हा तीन गुणांचा बहुपर्यायी प्रश्न होता तो प्रश्न ,खालील बहु पर्यायी प्रश्नचा योग्य पर्याय शोधून लिहा असा होता. दहावीच्या पाठ्यपुस्तकात देखील असाच प्रश्न विचारला आहे विद्यार्थी त्याप्रमाणेच केवळ उत्तर लिहणार ते पूर्ण वाक्यात उत्तर लिहणार नाहीत. प्रश्न जर "पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा " असा असता तर विद्यार्थ्यांनी तसे उत्तर  लिहिले असते. पण बोर्डाने तसल्या सूचना आधी दिल्या नाहीत आता मात्र उत्तर पत्रिका तपासताना मुख्य नियामक (moderator )ने मराठीच्या उत्तर पत्रिका तपासताना "बहुपर्यायी प्रश्नाचे केवळ पर्याय लिहिला असेल तर अर्धा गुण कमी करावा व पूर्ण वाक्यातील उत्तरास पूर्ण गुण द्यावा." असे पत्रक काढून पेपर तपासनीसांना धक्का दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दीड गुणांचे नुकसान होणार आहे.
मुंबई बोर्डाचे सी. एम. श्री ए . आर . सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोर्डाच्या सुचनांचे समर्थन केले आहे.