शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

अन्नधान्य वितरणात काळाबाजार माजला

By admin | Updated: February 1, 2015 02:13 IST

काळाबाजार आहे, अशी कबुली देत तो थांबविण्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली़

अहमदनगर : अन्नधान्य वितरणात मोठ्या प्रमाणात काळाबाजार आहे, अशी कबुली देत तो थांबविण्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली़अहमदनगर येथे शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी बापट आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात चार ठिकाणी सध्या बायोमेट्रीक प्रणाली प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे़ लवकरच सर्वत्र ही प्रणाली राबविण्यात येईल.सध्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना धान्य पुरवठा होत आहे़ मात्र, काँगे्रस सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दारिद्य्ररेषेवरील लोकांनाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला होता़ राज्य सरकारने केंद्र सरकारकडील निधीची शहानिशा न करताच निर्णय घेतला़ त्यामुळे त्याची अंमलबजावणी करायची असल्यास राज्य सरकारवर १,५०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे़ हा निर्णय राबविताना गरजू नागरिकांचा शोध घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे़ अन्नधान्य वितरण करताना सर्व लाभधारकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याबाबत सरकारचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.शिरुर (जि़ पुणे) तालुक्यात बायोमेट्रीक प्रणालीचा प्रयोग करण्यात आला होता़ त्यामध्ये ३ वर्षांपासून अनेक नागरिक अहमदनगरला राहत असूनही धान्य वितरण होत असल्याचे निदर्शनास आले़ मग हे धान्य गेले कोठे, असा सवालही त्यांनी केला़ (प्रतिनिधी)रॉकेलचा कोटा वाढविलारॉकेलचा कोटा गॅसच्या संख्येवर ठरत असून, आता गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ गॅसधारकांना सवलतीचे रॉकेल दिले जात नाही़ त्यामुळे रॉकेल कोटा कमी होत आहे़ असे असतानाही या महिन्याचा रॉकेलचा कोटा २० टक्क्यांनी वाढविल्याचे त्यांनी सांगितले.गुटखा विक्रीअजामीनपात्र गुन्हागुटखा विक्री करताना अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकांनी पकडल्यास केवळ दंडात्मक कारवाई केली जाते़ त्यामुळे विक्रेत्यांचे फावते़ मात्र, आता सरकारने याबाबत गंभीर पावले उचलली असून, लवकरच कायद्यात बदल करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे़ तसेच जप्त केलेल्या मालाला पाय फुटतात़ त्यासाठी गोडावून बांधण्यात येणार असून, मालाची विल्हेवाट लावताना पंचांसमक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे़ अन्न निरीक्षकांना तीन महिन्यांत वाहने पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़