शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

सेनेचा भाजपाला गांधीगिरीने टोला

By admin | Updated: October 6, 2014 05:23 IST

दोनच दिवसांपूर्वी मोठा गवगवा करीत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत भाजपाला खरोखर किती गांभीर्य आहे,

जमीर काझी, मुंबईदोनच दिवसांपूर्वी मोठा गवगवा करीत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत भाजपाला खरोखर किती गांभीर्य आहे, याचा प्रत्यय शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेल्या सभेनंतर पाहावयास मिळाला. रेसकोर्स मैदानावर सभेनंतर हजारो पाण्याच्या बाटल्या, कापडी झेंडे, मफलरी, पत्रके, कमळाचे बिल्ले पडून होते. भाजपाच्या नेत्यांना या अस्वच्छतेबाबत कसलीही फिकीर नव्हती की त्याबाबत कार्यकर्त्यांना कसलीही सूचनाही करण्यात आली नव्हती. पंतप्रधानांसह त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतच्या शपथेचे इतक्यात विस्मरण झाले का, अशी विचारणा ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.मैदानावर रात्रभर पडून राहिलेला कचरा शिवसैनिकांनी रविवारी सकाळी ‘गांधीगिरी’ करीत स्वच्छ केला आणि भाजपाच्या उक्ती आणि कृतीमध्ये जमीन-आस्मानाचा फरक असल्याचे दाखवून दिले. मलबार हिल मतदारसंघातील सेनेचे उमेदवार अरविंद दूधवडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर सुमारे अर्धा तास स्वच्छता मोहीम राबवित जागोजागी पडलेला कचरा एकत्र केला आणि सर्व ढीग कचराकुंडीत टाकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमाचा प्रारंभ केला. मोदी यांनी स्वत: झाडू हातात घेत इंडिया गेट ंयेथील कचरा साफ केला होता, विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी या अभियानाला मोठी प्रसिद्धी दिली होती. ‘मी कचरा करणार नाही, करू देणार नाही,’ अशी शपथ देशभरात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली होती. मात्र शनिवारी रेसकोर्सवर मोदींच्या सभेला जमलेल्या हजारो श्रोत्यांना त्याचा विसर पडला होता. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटलेल्या पाण्याच्या बाटल्या, पक्षाचे झेंडे, चिन्ह असलेल्या टोप्या, मफलरी, पत्रके आणि कमळाची प्लॅस्टिकची चिन्हे त्याच ठिकाणी टाकून दिली होती. ते सर्व एकत्र ठेवण्याबाबत एकाही भाजपाच्या नेत्याने सूचना केली नव्हती. आज सकाळी ७च्या सुमारास शिवसेनेचे खा. अरविंद सावंत, उमेदवार अरविंद दूधवडकर, कार्यकर्त्यांसमवेत ‘मार्निंग वॉक’ला येणाऱ्या परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी मैदानावर गेले होते. त्यांना भेटणारे नागरिक मैदानावर इतस्तता पडलेल्या कचऱ्याबाबत नाराजी व्यक्त करीत होते. त्यामुळे दूधवडकर यांनी तातडीने झाडू मागवून घेत सर्व कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला. अर्धा तासाच्या स्वच्छता मोहिमेनंतर पालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यात आला. या वेळी काँग्रेसचे मदन बाफनाही उपस्थित होते. (प्रतिनिधी)