शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

वरळीत भाजपाची फिल्डिंग

By admin | Updated: January 21, 2017 02:53 IST

वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

चेतन ननावरे,

मुंबई- वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार हजारांहून अधिक मतदारांना आधारचे स्मार्टकार्ड मोफत वितरित करून भाजपाने संपर्काचा नवा फंडा वापरला आहे.केवळ निवडणुका आहेत, म्हणून हा उपक्रम घेतला नसल्याचे भाजपाचे वडाळा विधानसभा सचिव राजेंद्र (राजन) डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्मार्टकार्डसाठी ठिकठिकाणी वेगवेगळे दर आकारले जातात. बहुतांश लोकांना स्मार्टकार्डची माहिती नसून काही ठिकाणी तळागाळातील नागरिकांची आर्थिक लूटही केली जाते. त्यामुळे स्मार्टकार्डची माहिती, उपयोग आणि लाभ मिळवून देण्याची मागणी विभागातील नागरिकांकडून होत होती. त्यामुळे मोफत स्मार्टकार्ड काढून देण्याचा उपक्रम राबवला. आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे हजार नागरिकांनी या उपक्रमाची मागणी केली होती. मात्र चार हजारांहून अधिक नागरिकांनी याचा फायदा घेतला.स्मार्टकार्डशिवाय भाजपाने विभागातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही वेगवेगळे उपक्रम राबविल्याचा दावा डेरवणकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात, चाय के साथ’ उपक्रम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्या वाटप, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम वरळीत याआधीही स्वत: राबवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दहीहंडी सणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्यानंतर नियमांचे पालन करणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या करून दाखवले होते. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवलेला नाही, तर याआधीही सातत्याने वरळीत उपक्रम राबवल्याचे डेरवणकर यांनी सांगितले.>पक्षबांधणी महत्त्वाची!केवळ एक उपक्रम घेऊन मतदारांशी संपर्क साधता येत नाही, असेही डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून या ठिकाणी पक्षबांधणी करत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी बैठका घेत आहे. शिवाय भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील योजना विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.>अन्य पक्षही सरसावलेभाजपाने मतदारांना गाठण्याची लढवलेली शक्कल पाहून अन्य पक्षीय नेत्यांनीही या प्रभागात कामांचा धडाका सुरू केला आहे. यापुढच्या काही दिवसांमध्ये पक्षीय कामांची गती अधिक सुरू राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या प्रभागातील नागरी समस्यांचे मुद्दे करण्यासाठीही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.