शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

वरळीत भाजपाची फिल्डिंग

By admin | Updated: January 21, 2017 02:53 IST

वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

चेतन ननावरे,

मुंबई- वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार हजारांहून अधिक मतदारांना आधारचे स्मार्टकार्ड मोफत वितरित करून भाजपाने संपर्काचा नवा फंडा वापरला आहे.केवळ निवडणुका आहेत, म्हणून हा उपक्रम घेतला नसल्याचे भाजपाचे वडाळा विधानसभा सचिव राजेंद्र (राजन) डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्मार्टकार्डसाठी ठिकठिकाणी वेगवेगळे दर आकारले जातात. बहुतांश लोकांना स्मार्टकार्डची माहिती नसून काही ठिकाणी तळागाळातील नागरिकांची आर्थिक लूटही केली जाते. त्यामुळे स्मार्टकार्डची माहिती, उपयोग आणि लाभ मिळवून देण्याची मागणी विभागातील नागरिकांकडून होत होती. त्यामुळे मोफत स्मार्टकार्ड काढून देण्याचा उपक्रम राबवला. आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे हजार नागरिकांनी या उपक्रमाची मागणी केली होती. मात्र चार हजारांहून अधिक नागरिकांनी याचा फायदा घेतला.स्मार्टकार्डशिवाय भाजपाने विभागातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही वेगवेगळे उपक्रम राबविल्याचा दावा डेरवणकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात, चाय के साथ’ उपक्रम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्या वाटप, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम वरळीत याआधीही स्वत: राबवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दहीहंडी सणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्यानंतर नियमांचे पालन करणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या करून दाखवले होते. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवलेला नाही, तर याआधीही सातत्याने वरळीत उपक्रम राबवल्याचे डेरवणकर यांनी सांगितले.>पक्षबांधणी महत्त्वाची!केवळ एक उपक्रम घेऊन मतदारांशी संपर्क साधता येत नाही, असेही डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून या ठिकाणी पक्षबांधणी करत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी बैठका घेत आहे. शिवाय भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील योजना विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.>अन्य पक्षही सरसावलेभाजपाने मतदारांना गाठण्याची लढवलेली शक्कल पाहून अन्य पक्षीय नेत्यांनीही या प्रभागात कामांचा धडाका सुरू केला आहे. यापुढच्या काही दिवसांमध्ये पक्षीय कामांची गती अधिक सुरू राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या प्रभागातील नागरी समस्यांचे मुद्दे करण्यासाठीही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.