शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सरकार-संघटनेतील दुराव्यामुळे भाजपा चिंतित

By admin | Updated: May 23, 2015 01:03 IST

भाजपाचे नेते, कार्यकर्त्यांचा ‘पब्लिक कनेक्ट’ कमी होत असल्याची चिंता पक्षाला सतावत असल्याचे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट झाले.

यदु जोशी - कोल्हापूरभाजपाचे नेते, कार्यकर्त्यांचा ‘पब्लिक कनेक्ट’ कमी होत असल्याची चिंता पक्षाला सतावत असल्याचे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट झाले. केंद्र तसेच राज्य सरकार दरदिवशी चांगले निर्णय घेत आहे; मात्र ते जनतेपर्यंत पोहोचत नसल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. १९९५ ते ९९ या काळात तत्कालिन युती सरकारने चांगले निर्णय घेऊनही राज्यात पुन्हा सत्ता आली नाही. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, जनतेपर्यंत जा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक शुक्रवारपासून येथे सुरू झाली. त्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकारचे निर्णय सामान्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी कार्यकर्ते, नेत्यांनी सक्रिय सहभाग देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. सरकारच्या निर्णयांचे वाहक म्हणून पक्षसंघटनेने संचलन समितीप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे, असे सांगून, सरकार आणि संघटनेने एकमेकांचा आदर केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाचे सरकार आणि पक्ष संघटना यांत समन्वय नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून हीच बाब अधोरेखित झाली. भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील ४४ आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ९५ मध्ये युती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले होते; पण ते जनते पर्यंत न पोहचल्यानेच सत्ता गेली. त्यातून धडा घेऊन काम करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. सरकारमध्ये भाजपाचे नेते, कार्यकर्ते हे जनतेच्या हिताची कामे घेऊन आल्यानंतर त्यांना सन्मानाचीच वागणूक मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राच्या एक वर्षाच्या तर राज्य सरकारच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण समोर आले नाही, ही बाब अभिमानाने सांगा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.च्भाजपा २६ मेपासून ‘जनकल्याण पर्व’ राबविणार आहे. त्यात शिवसेनेचे मंत्री अनंत गीते यांनीही दाखविली आहे. त्यासाठी काय करायचे अशी विचारणा त्यांनी आपल्याकडे फोनवरून केली, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यावर, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात काही बदल झाले तर....!’ ही भीती तर या विचारणेमागे नाही ना, असा चिमटा विनोद तावडे यांनी काढताच हशां पिकला.प्रदेश कार्यालयात मंत्र्यांचा जनता दरबारमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील आणि राज्यातून केंद्रात गेलेल्या सर्व मंत्र्यांना प्रदेश कार्यालयात जनता दरबार घेण्याचे आदेश शुक्रवारच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिले. त्याविषयीचे जूनचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. याशिवाय, मंत्र्यांना दर आठवड्यात किमान २ तास पक्ष कार्यालयात बसून जनतेशी संवाद साधावा लागणार आहे.