शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

.. तर शिवसेनेच्या विरोधात भाजपही बोलेल

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

माधव भंडारी : महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम झाला असता..

फलटण : ‘बिहार राज्याच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तेथील निवडणूक निकालाचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांवर होणार नाही. आगामी काळात राज्यातील प्रश्नांबाबत शिवसेना नेते काही बोलणार असतील तर आम्हीही विरोधात बोलू,’ असा इशारा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता असेही स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे महाराष्ट्र युवक व्यसनमुक्त कार्यालय इमारतीच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात नागरी प्रश्न व विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते बोलत असताना शिवसेनेने आमच्यावर टीका केली. आम्हालाही ‘सौ सोनार की एक लोहार की’ याप्रमाणे बोलावे लागले. आम्ही गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘शिवसेना मित्र आहे म्हणूनच आम्ही मर्यादा पाळत आहोत. मात्र, ते काही बोलणार असतील तर आम्हीही विरोधात बोलण्यास मागे राहणार नाही.’‘बिहार निवडणुकीचे परिणाम अन्य कुठल्याही राज्याच्या निवडणुकांवर होणार नाहीत. बिहारमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याच्या निकालाने पक्षांतर्गत कोणतीही धुसफूस नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरूच राहणार आहे.’भाजपचे सरकार केंद्र व राज्यात आल्यापासून विकासकामांना गती आली आहे. सामान्यांच्या हिताची अनेक कामे करायची आहेत. अशा स्थितीत काही पक्ष अपप्रचार करीत आहेत, असे सांगून भंडारी म्हणाले, ‘काँग्रेस व डाव्यांना भाजपचे अस्तित्व मान्य नाही. राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. अशा स्थितीत सरकारने २४ टीएमसी पाणी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने तुरडाळीच्या साठ्यावर धाडी घालून कारवाई करून दरवाढीवर नियंत्रण मिळवले. मात्र २०१२-१३ मध्ये तूरडाळीचे भाव २१० रुपये प्रतिकिलो होते. तत्कालीन सरकारला त्या वेळी डाळीचे भाव कमी करता आले नाहीत.’ (प्रतिनिधी)पालखी मार्गाचे काम लवकरच...आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार लवकरच सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाळवंटाचा प्रश्न न्यायालयाच्या आधीन राहून भाजप सरकारनेच सोडविला आहे. आणखी दोन पाऊस झाल्यास राज्याचा चेहरामोहरा भाजप बदलून दाखवेल. त्याचबरोबर अच्छे दिन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी विविध योजना प्रभावी राबविण्यासाठी आग्रही आहेत, असेही भंडारी यांनी सांगितले.