शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात कुणी गद्दार नाही!

By admin | Updated: July 4, 2016 04:36 IST

भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जळगाव : भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. विशेष म्हणजे खा. रक्षा खडसे, आ. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतच महाजन यांनी हे मत मांडले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावातच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, माझ्यावर जे आरोप झाले तो कटाचा एक भाग आहे. पक्षातील गद्दारांचा आधी बंदोबस्त करा, असे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता महाजन म्हणाले की, पक्षात गद्दार असल्याचे मला वाटत नाही. मी मोठा नेता नाहीखडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपण महिनाभर गप्प का होते? यावर महाजन म्हणाले, खडसेंवरील आरोपांबाबत खुद्द खडसे त्यांच्या मागणीनुसार चौकशी सुरु असून लवकरच ती पूर्ण होईल व ते अग्निदिव्यातून तावून सलाखून बाहेर पडतील. आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता नाही. त्यामुळे खुलासा करण्याचा प्रश्नच येत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळगावला तापी महामंडळात विचारलेली माहिती त्यांना तोंडी स्वरुपात देण्यात आली. त्यांना कोणतीही कागदपत्रे दिलेली नाही. ती त्यांना हवी असल्यास त्यांनी माहितीचा अधिकार वापरावा, असेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)>खडसे-महाजन एकाच व्यासपीठावरजळगावच्या जिल्हा बँक सभागृहात रविवारी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे, गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते, परंतु आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. आरोपांबाबत कुणी पुरावेही दिले नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत खडसे यांनी मेळाव्यात व्यक्त केली.दमणगंगा-पिंजाळचे पाणी मुंबईलादमणगंगा-पिंजाळचे वाहून जाणारे पाणी मुंबईसाठी वळविण्यात येऊन मुंबईकरांची तहान भागविण्यात येईल. तसेच तापी-नर्मदाचे वाया जाणारे पाणीही गुजरातच्या सिमेवरुन उचलण्याचा प्रयत्न आहे. अन्यथा या पाण्याच्या बदल्यात गुजरातने महाराष्ट्राला पाणी द्यावे, अशीही आपली मागणी आहे.