शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भाजपात कुणी गद्दार नाही!

By admin | Updated: July 4, 2016 04:36 IST

भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जळगाव : भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. विशेष म्हणजे खा. रक्षा खडसे, आ. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतच महाजन यांनी हे मत मांडले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावातच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, माझ्यावर जे आरोप झाले तो कटाचा एक भाग आहे. पक्षातील गद्दारांचा आधी बंदोबस्त करा, असे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता महाजन म्हणाले की, पक्षात गद्दार असल्याचे मला वाटत नाही. मी मोठा नेता नाहीखडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपण महिनाभर गप्प का होते? यावर महाजन म्हणाले, खडसेंवरील आरोपांबाबत खुद्द खडसे त्यांच्या मागणीनुसार चौकशी सुरु असून लवकरच ती पूर्ण होईल व ते अग्निदिव्यातून तावून सलाखून बाहेर पडतील. आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. मी त्यांच्यापेक्षा मोठा नेता नाही. त्यामुळे खुलासा करण्याचा प्रश्नच येत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळगावला तापी महामंडळात विचारलेली माहिती त्यांना तोंडी स्वरुपात देण्यात आली. त्यांना कोणतीही कागदपत्रे दिलेली नाही. ती त्यांना हवी असल्यास त्यांनी माहितीचा अधिकार वापरावा, असेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)>खडसे-महाजन एकाच व्यासपीठावरजळगावच्या जिल्हा बँक सभागृहात रविवारी राज्य ग्रामसेवक युनियनच्या मेळाव्यात एकनाथ खडसे, गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. काम करीत असताना चुका होतात. शासकीय कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना किमान उत्तर तरी देता येते, परंतु आम्ही त्याचे उत्तरही देऊ शकत नाही. आरोपांबाबत कुणी पुरावेही दिले नाही. त्यानंतर काय शिक्षा झाली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी खंत खडसे यांनी मेळाव्यात व्यक्त केली.दमणगंगा-पिंजाळचे पाणी मुंबईलादमणगंगा-पिंजाळचे वाहून जाणारे पाणी मुंबईसाठी वळविण्यात येऊन मुंबईकरांची तहान भागविण्यात येईल. तसेच तापी-नर्मदाचे वाया जाणारे पाणीही गुजरातच्या सिमेवरुन उचलण्याचा प्रयत्न आहे. अन्यथा या पाण्याच्या बदल्यात गुजरातने महाराष्ट्राला पाणी द्यावे, अशीही आपली मागणी आहे.