शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

आरक्षण संपविण्याचे भाजपा सरकारचे प्रयत्न

By admin | Updated: October 24, 2015 01:46 IST

अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवात प्रकाश आंबेडकरांची भाजप, संघावर टीका.

अकोला: देशामध्ये सत्तांतर झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, भाजप त्यांचे विचार देशावर लादण्याचा प्रयत्न करताहेत. हे विचार देशविरोधी आहे. घटना बदलविण्याचे त्यांचे प्रयत्न असून, आता तर हिंदू ओबीसींच्या आरक्षणालाच त्यांनी विरोध सुरू केला आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत संघाला ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणायचं आहे आणि नंतर अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षणावर घाला घालायचा आहे. हे आरक्षण कायम ठेवायच असेल, तर धर्मांध शक्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित ३0 व्या धम्मचक्र प्र्वतन दिन महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अँड. आंबेडकर पुढे म्हणाले, घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद आहे; परंतु तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना घटनादुरुस्तीची संधी न मिळाल्याने त्यांनी मंडल कमिशन नेमलं आणि ओबीसींना आरक्षण दिलं. याचदरम्यान रथयात्रा काढून भाजपने धर्माचं राजकारण केलं. आता संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समीक्षण करण्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले. हे समीक्षण आधी ओबीसींच होईल, हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. भाजप सरकार संघाला बांधील आहे. एकूणच ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल, असा प्रयत्न संघ, भाजपकडून होत असल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी यावेळी केला. ओबीसींचं आरक्षण संपविल्यानंतर अनुसूचित जाती, जमातीचं आरक्षण संपवायचं, असे षड्यंत्र संघाने रचले आहे. २0१९ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत घटनाच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार कायम ठेवायचे असतील, तर संघर्षासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे. ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी ते वाचविण्यासाठी वाहक बनण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अँड. आंबेडकर म्हणाले.