शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

आरक्षण संपविण्याचे भाजपा सरकारचे प्रयत्न

By admin | Updated: October 24, 2015 01:46 IST

अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवात प्रकाश आंबेडकरांची भाजप, संघावर टीका.

अकोला: देशामध्ये सत्तांतर झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप, भाजप त्यांचे विचार देशावर लादण्याचा प्रयत्न करताहेत. हे विचार देशविरोधी आहे. घटना बदलविण्याचे त्यांचे प्रयत्न असून, आता तर हिंदू ओबीसींच्या आरक्षणालाच त्यांनी विरोध सुरू केला आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत संघाला ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणायचं आहे आणि नंतर अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षणावर घाला घालायचा आहे. हे आरक्षण कायम ठेवायच असेल, तर धर्मांध शक्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित ३0 व्या धम्मचक्र प्र्वतन दिन महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अँड. आंबेडकर पुढे म्हणाले, घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद आहे; परंतु तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना घटनादुरुस्तीची संधी न मिळाल्याने त्यांनी मंडल कमिशन नेमलं आणि ओबीसींना आरक्षण दिलं. याचदरम्यान रथयात्रा काढून भाजपने धर्माचं राजकारण केलं. आता संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समीक्षण करण्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले. हे समीक्षण आधी ओबीसींच होईल, हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. भाजप सरकार संघाला बांधील आहे. एकूणच ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येईल, असा प्रयत्न संघ, भाजपकडून होत असल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी यावेळी केला. ओबीसींचं आरक्षण संपविल्यानंतर अनुसूचित जाती, जमातीचं आरक्षण संपवायचं, असे षड्यंत्र संघाने रचले आहे. २0१९ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत घटनाच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांचे अधिकार कायम ठेवायचे असतील, तर संघर्षासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे. ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी ते वाचविण्यासाठी वाहक बनण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अँड. आंबेडकर म्हणाले.