शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 18, 2015 09:42 IST

विधानपरिषदेचे सभापतींविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी उतावीळ होते व यात  सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजुर करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली होती. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीशी युती नाही असे सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस आता राष्ट्रवादीचे चुंबन घेताना दिसत असून हे चित्र बघून महाराष्ट्रातील मतदारांना आपण द्रौपदी झालो व भर बाजारात आपले वस्त्रहरण झाल्याचे वाटते असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारातमीत जाऊन शरद  पवार आपले मार्गदर्शक असल्याचा गौप्यस्फोट केला याकडेही उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले. सध्या महाराष्ट्रात जे चालले ते राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही असेही त्यांनी म्हटले आहे.