शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 18, 2015 09:42 IST

विधानपरिषदेचे सभापतींविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी उतावीळ होते व यात  सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजुर करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली होती. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीशी युती नाही असे सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस आता राष्ट्रवादीचे चुंबन घेताना दिसत असून हे चित्र बघून महाराष्ट्रातील मतदारांना आपण द्रौपदी झालो व भर बाजारात आपले वस्त्रहरण झाल्याचे वाटते असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारातमीत जाऊन शरद  पवार आपले मार्गदर्शक असल्याचा गौप्यस्फोट केला याकडेही उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले. सध्या महाराष्ट्रात जे चालले ते राज्याच्या परंपरेला शोभणारे नाही असेही त्यांनी म्हटले आहे.