शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

भाजपाला काँग्रेसचीच साथ

By admin | Updated: March 24, 2017 01:46 IST

‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ

यवतमाळ : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ सत्तेच्या लालसेपोटी साथ दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यवतमाळ, जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी हे विसंगत चित्र पहायला मिळाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेस पक्षच नव्हे तर या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपाने टार्गेट केले. संपूर्ण निवडणूक प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच मुख्य अजेंडा ठेवण्यात आला होता. काँग्रेसला देशातून हाकलून लावू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकवणे, त्यांच्यापासून अंतर राखून रहाणे, शक्य असेल तेथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे, त्यांच्या जातीयवादी विचारधारेला जनतेपुढे उघडे करणे आदी प्रयत्न काँग्रेसकडून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपाला विरोध करण्याऐवजी केवळ सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला मुठमाती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका राज्यात पार पडल्या. या निवडणुकीत विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, मात्र जातीयवादी पक्षांशी युती करू नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी छेद देऊन जातीयवादीय पक्षांना सत्तेत मदतीचा हात दिला. कुठे प्रत्यक्ष पाठिंबा देऊन तर कुठे सभागृहात अनुपस्थित राहून काँग्रेसने भाजपाला पाठबळ दिल्याचे चित्र आहे.यवतमाळात ठाकरे-मोघेंचा खेळ यवतमाळात भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. सुरुवातीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा त्यासाठी आग्रह होता. अन्य काही नेते विरोधात होते. मात्र अध्यक्षपदाचा लालदिवा आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात येऊ शकतो याची जाणीव होताच माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे हेसुद्धा भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी तयार झाले. ठाकरे-मोघेंच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेतेही वाहवत गेले. जळगावातही भाजपा-काँग्रेसची सत्ता बसली. अन्य काही ठिकाणीसुद्धा अशी छुपी अ‍ॅडजेस्टमेंट करण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेसला संपविणे हेच टार्गेट-काँग्रेसला संपविण्यासाठी विविध पर्याय भाजपाकडून अवलंबिले जात आहे. काँग्रेसमधील नाराज, दुखावलेल्या व असंतुष्ट कार्यकर्त्यांना उमेदवारी, लाभ, पदाचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात भाजपात आणले जात आहे. आता सत्तेत वाटेकरी करून काँग्रेसच्या नैतिकतेलाच भाजपाकडून सुरूंग लावला गेला आहे. सत्तेसाठी भाजपाची साथ घेतल्याने आता काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांना भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणण्याची नैतिकताच उरलेली नाही. काँग्रेसचे तोंड बंद करण्याची भाजपाची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसते.अध्यक्ष काँग्रेसचा, रिमोट भाजपाकडे-यवतमाळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे व रिमोट भाजपाच्या हाती आहे. या माध्यमातूनही काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी जाहिरात फलकांवर केवळ भाजपा नेत्यांची छायाचित्रे झळकत असून काँग्रेस बरीच मागे पडली आहे.‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ -भाजपा-काँग्रेसच्या या सत्ता-समीकरणावर सोशल मीडियावरून काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ असा प्रचार करुन ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपाच्या घोषणेला त्यांच्या पाठीराख्यांकडून आणखी सशक्त केले जात आहे. सत्तेसाठी काँग्रेस काय करू शकते, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपा समर्थकांकडून होत आहे.