शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

By admin | Updated: November 12, 2015 03:30 IST

बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला

अडवाणींच्या नेतृत्वातही पराभव झालाच होता की!नागपूर : बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला. या बुजुर्गांवर थेट पलटवार करताना त्यांनी पक्षातील परंपरा आणि अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमधील पराभवाचे स्मरण करून दिले. इतकेच नव्हे, तर मोदी आणि शहा यांच्या विरोधात बेजबाबदार जाहीर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची जाहीर भूमिका गडकरी यांनी घेतली. बिहारमध्ये भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पक्षात मतभेदांचे फटाके जोरात वाजू लागले आहेत. ही फटाकेबाजी अजून थांबलेली नाही. मंगळवारीच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांताकुमार यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी येथे पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, या पराभवाबद्दल केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. या पराभवाची सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरणाऱ्यांची वक्तव्ये बेजबाबदार आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. नितीशकुमारांचा चिमटादारुण पराभवानंतर भाजपात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर आपण काही बोलणार नाही, असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खास शैलीत चिमटा काढला. ‘दूर बैठे हुए व्यक्ती की तरह देख सकता हूँ’, असे सांगत ते म्हणाले, प्रचारात एवढा आटापिटा करूनही पराभव झाल्याने असे होणे स्वाभाविक आहे.नाही तरी प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होतच असते! ‘अटल, अडवाणी और मुरली मनोहर, भाजपा के तीन धरोहर’ हे या पक्षाचे पूर्वी घोषवाक्य होते, याचेही त्यांनी खुबीने स्मरण करून दिले.अडवाणी, जोशी यांनी जारी केलेल्या निवेदनावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या मुद्द्यावर अडवाणींशी चर्चा करणार आहोत. बिहारमध्ये आमचा पक्ष आणखी बळकट करण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. बिहारमधील पराभवानंतर अमित शहा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सेनेचाही टोलाभाजपात लालकृष्ण अडवाणी यांचा लेटरबॉम्बच नाही तर अजून बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची आहे, असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे व्यक्त केले. -वृत्त/४