शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

कृषी विद्यापीठातर्फे बायोगॅस विकसित

By admin | Updated: May 12, 2014 22:36 IST

३0 टक्के अधिक गॅस या सुधारित बायोगॅस सयंत्रापासुन मिळतो.

मेहकर : अपारंपरिक उर्जा व विद्युत अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांचेद्वारा विकसीत केलेल्या सुधारीत बायोगॅस संयत्रापासून ईतर कोणत्याही सयंत्राच्या तुलनेत ३0 टक्के अधिक गॅस मिळतो. त्यामुळे सुधारित बायोगॅस सयंत्र हे इंधन टंचाईवर रामबाण उपाय ठरत असल्यचा अनुभव मेहकर तालुक्यात येत आहे. ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा दुध- दुभत्यासाठी गाई, म्हशी या सारखे दुधाळ जनावरे पाळण्यात येतात. ग्रामीण भागात असलेले अरुंद रस्ते आणि मार्यादीत जागा यामुळे जागेअभावी गोबर गॅस सयंत्र बांधकामासाठी अडचणी येत होत्या. परंतू आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे बर्‍याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचे घर बांधकाम करुन गुरांचा गोठा यासह शेतामध्येच वस्ती करण्याकडे शेतकरी वर्गाचा ओढा वाढला आहे. शेतकरी वर्गात आजही बायोगॅस बाबत पुरेशी जागरुकता नसल्यामुळे बायोगॅसचा वापर अत्यंत कमी आहे. बायोगॅस बाबत तांत्रिक माहिती देण्यासाठी सक्षम यंत्रणा नसणे, दररोजचे मानवी कष्ट, शेतमजुराची टंचाई, बायोगॅस सयंत्रामध्ये शेण-पाणी टाकण्यात सातत्य नसल्यामुळे सयंत्रापासुन पुर्ण क्षमतेने गॅस निर्मीती न होणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी वर्गाने बायोगॅस तंत्रज्ञानाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यावर उत्तम पर्याय म्हणुन अपारंपरिक उर्जा व विद्युत अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांचेद्वारा सुधारित बायोगॅस सयंत्र विकसीत करण्यात आलेले आहे. ईतर कोणत्याही सयंत्राच्या तुलनेत ३0 टक्के अधिक गॅस या सुधारित बायोगॅस सयंत्रापासुन मिळतो. बुलडाणा जिल्ह्यातील केवळ मेहकर तालुक्यातील फर्दापूर, कळपविहिर, वडगाव माळी, नायगाव दत्तापूर, देऊळगाव साकर्शा या गावांमध्ये सदर सुधारित बायोगॅस सयंत्र बांधण्यात आले असून ते पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच आता मेहकर तालुक्यातील कल्याणा येथे तीन, गजरखेड येथे दोन, शेंदला येथे एक व मेहकर येथे दोन बायोगॅस सयंत्राचे बांधकाम ज्ञानेश्‍वर तायडे हे करीत आहेत. या बायोगॅस सयंत्रामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा फायद होणार असल्याचे बोलले जात आहे. ** असे आहे सुधारित स्वरूप सुधारित बायोगॅस सयंत्रात एक फुट व्यासाचा व साडे आठ फुट लांबीचा आर.सी.सी. पाईप असल्यामुळे शेण-पाणी यांचे मिश्रण करावे लागत नाही. यामुळे श्रमाची आणि वेळेची बचत होते. सुधारित बायोगॅस सयंत्रात केवळ गुरांचे शेणच टाकले जात असल्याने, परिणामी ३0 टक्के अधिक गॅस उत्पादन होते. तसेच यापासुन मिळालेली मळी घट्ट असुन ती शेतात वाहुन नेण्यास सोयीची आहे. यामुळे जमीनीचा पोत सुधारण्यासही मदत ठरते. बायोगॅस सयंत्र ते स्वयंपाकघर यांचे अंतर तब्बल ७00 ते १ हजार फुटापर्यंत असलेतरीही गॅस पुर्ण दाबाने मिळतो.