शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता जपण्यासाठी देशी झाडांची लागवड गरजेची

By admin | Updated: March 6, 2017 01:22 IST

भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते.

बारामती : भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते. मात्र, महाराष्ट्रात कागदोपत्री २०.४ टक्केच क्षेत्र वनक्षेत्राखाली असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात देशी वनसंपदा जतन करणे, देशी झाडांची लागवड जास्तीत जास्त करणे आवश्यक असताना, ज्या परदेशी झाडांची आवश्यकता नसताना मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे वाढते तापमान, वातावरणातील बदल दूर करण्यासाठी दीर्घकालीन विकासासाठी स्थानिक देशी वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी चित्रपट अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना (वन) आवाहन केले आहे.आई जन्म देते आणि झाड माणसाला श्वास देत जगवत असते. ज्या झाडाचे पान, फूल, फळ, मूळ आपण खाऊ शकतो, अशीच झाडे लावली पाहिजे. त्याचबरोबर जैवविविधता वाढेल, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड, सुहास वायगणकर, प्रा. लक्ष्मी शिंदे, डॉ. पाटील, प्रसाद मगदूम या पर्यावरण संशोधकांनी याबाबत संपूर्ण राज्यात दौरा केला. शाळा, महाविद्यालयस्तरावर जनजागृती केली. शास्त्रीयदृष्ट्या देशी झाडेच पर्यावरण रक्षण करू शकतात. त्यामुळे केवळ परदेशी शोभिवंत झाडे लावण्यापेक्षा देशी झाडांनाच महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परदेशी झाडांचा धोकाच अधिक....सध्या निलगिरी, आॅस्ट्रेलियन बाभुळ, गिरीपुष्प, अशोक, गुलमोहर, निलमोहर, पिचकारी, रेन ट्री, सिल्व्हर ओक, सुरू, अशी झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. ही झाडे पर्यावरणाला हानीकारक आहेत. जैवविविधेतेच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. ही झाडे भूगर्भातील पाणी अधिक खेचतात. या झाडांची पाने लवकर कुजत नाहीत. परिणामी तेथे कीटक, सूक्ष्म जीवजंतू येत नाहीत. जैविक विघटन होत नाही. वादळात, मोठ्या पावसात ही झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडतात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पर्यावरण रक्षण होत नाही. त्यामुळे देशी झाडांनाच राज्यात सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक वनविभाग, सामाजिक वनीकरण आदींना याबाबत सुचित करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)>देशी झाडांमुळे जैवविविधता...परदेशी झाडे सर्वांनाच हानीकारक आहेत. चुकीच्या झाडांचे रोपण केल्यामुळे माळढोक पक्षी सोलापूरमधून दुर्मिळ होत आहे. पश्चिम घाटात निलगिरीच्या दाट भागातून भातखचरा नुकसान होत आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराई या प्रकल्पांतर्गत ५० पेक्षा स्थानिक प्रजाती झाडांना महत्त्व दिले. त्यामुळे ६ हजार झाडे लावण्यात आली. त्यातून पर्यावरण रक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वड, आंबा, पिंपळ, चिंच, रामफळ, सीताफळ, नांद्रुक, बाभूळ, बोर, उंबर, जांभूळ, शेवगा, बिबा, रूद्राक्ष, कवट, वेल, कडीपत्ता, लिंबू, अंजीर, खैर, विलायती चिंच, अर्जुनी, अंजन, कांचन, मेडशिंगी, महारूग, पारिजातक, कळक, तुती, रक्तचंदन, देवबाभुळ, बोकर, सिंधी, रिटा, हेरडा, भेगडा, आपटा, सीतेचा अशोक, गुळभेंडी, सोनचाफा, बहावा, मोहगनी अशा देशी झाडांची वातावरणानुसार लागवड उपयुक्त ठरणार आहे.>जनजागृती...येथील निसर्ग जागर प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. महेश गायकवाड यांनी पुणे शहर, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांसह राज्यात याबाबत जनजागृती केली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार करावा. पर्यावरणपूरक झाडांमुळे वन्यजीवांनादेखील फायदा होतो, अशी जनजागृती गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे.