शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अब्जावधी लोक करतात उघड्यावरच नैसर्गिक विधी

By admin | Updated: May 9, 2014 23:31 IST

अश्मयुगापासून ते सायबरयुगापर्यंतच्या वाटचालीने मानवी जीवन सुखदायी झाले असले तरी विविध क्षेत्र समृद्ध करणारा मानवी समाज आजच्या २१ व्या शतकातही सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिछाडलेलाच आहे.

जिनेव्हा : अश्मयुगापासून ते सायबरयुगापर्यंतच्या वाटचालीने मानवी जीवन सुखदायी झाले असले तरी विविध क्षेत्र समृद्ध करणारा मानवी समाज आजच्या २१ व्या शतकातही सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिछाडलेलाच आहे. आजही जगभरात अब्जावधी लोक उघड्यावर नैसर्गिक विधी (मल-विष्ठा विसर्जन) करतात. वैयक्तिक आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असली तरी सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र आजही कमालीची अनास्था आहे. पेयजल व स्वच्छता’ याबाबत काय स्थिती आहे, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी काय उपाययोजना करणे जरुरी आहे, या विषयावर जागतिक आरोग्य संघटना व्यापक अभ्यास करून शिफारशींसह अहवाल करण्यात येणार आहे. उघड्यावर शौच केल्याने सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तसेच कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारख्या रोगांचा प्रार्दुभाव होतो. हे माहिती असुनही आजही याबाबत म्हणावी तेवढी जागरुकता निर्माण झालेली नाही, असे या कार्यक्रमाचे प्रभारी समन्वयक ब्रुस गॉर्डन यांनी म्हटले आहे. गॉर्डन यांच्या उपस्थितीत ‘पेयजल व स्वच्छता’ अभ्यास व पाहणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. शौचालय बांधण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून प्रोत्साहनही दिले जात आहे. असे असतानाही परिणाम मात्र फारसा समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचा व्यवस्थित वापर होत नसल्याने ती वापरली जात नाहीत. काही ठिकाणी तर सामानसुमान ठेवण्यासाठी वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत मात्र फारसे साध्य झालेले नाही. गरज आहे ती दृष्टीकोन बदलण्याची, असे मत युनिसेफ बालक निधीचे सांख्यिकीतज्ज्ञ रॉल्फ ल्युयेनदिज्क यांनी व्यक्त केले आहे. सर्वत्रच अनास्था आहे, असे नाही. अनेक देशांनी चांगली प्रगती केली आहे. व्हिएतनाम आणि बांगलादेशात १९९० मध्ये तिघांपैकी एक जण उघड्यावर शौचास जात होता. २०१२ पर्यंत ही प्रथा नष्ट झाली. उघड्यावर शौचाला जाणार्‍यांची संख्या आज जगभरात १ अब्ज असली तरी त्यापैकी ९० टक्के संख्या ग्रामीण भागातील आहे. (वृत्तसंस्था)

अनेक जण उघड्यावर, गटारी आणि ओढे-नाले किंवा तळ्याकाठी हा विधी उरकतात. १९९० मध्ये ही संख्या १.३ अब्ज होती. उप-सहारा आफ्रिकेतील २६ देशांत मात्र आजही ही वाईट प्रथा आहे. नायजेरियातील स्थिती अंत्यत वाईट आहे. युनोच्या पाहणीनुसार ८० देशांनी सार्वजनिक आरोग्याला घातक असलेली ही प्रथाच नष्ट करण्याच्या दृष्टीने चांगली प्रगती केली आहे. २०१५ पर्यंत जगभरातून ही प्रथाच नष्ट होईल, अस युनोचा अंदाज आहे.

भारतातही काही दुर्गम भागात ही प्रथा चालू असली तरी भारत सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमामुळे उघड्यावर शौचाला जाणार्‍यांची संख्या घटली आहे. गाव-खेड्यासह, शहर-निमशहर आणि मोठ्या शहरात सार्वजनिक स्वच्छतेवर भारत सरकारने अब्जावधींचा खर्च केला आहे.

दंडात्मक कारवाईसह विविध उपक्रम राबविले जात आहे. एका हातात मोबाईल आणि दुसर्‍या हातात डबडे घेऊन हगणदारीकडे जाणारे लोक, हे भारतातील चित्र धक्कादायक असल्याचे डब्ल्यूएचओच्या पब्लिक हेल्थ डायरेक्टर मारिया नीरा म्हणाल्या.