शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

‘पॅकेजिंग’कडून मोठ्या अपेक्षा

By admin | Updated: May 16, 2015 03:28 IST

भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेषक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची

मुंबई : भारतातील पॅकेजिंग उद्योगामध्ये सर्वसमावेषक वृद्धीची, ग्रामीण संपन्नता निर्माण करण्याची तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे. पॅकेजिंगला उद्योगाने महिला बचत गटाच्या उत्पादनांना, ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलेला तसेच आदिवासींनी तयार केलेल्या वनांवर आधारित वस्तूंना बाजारपेठक्षम बनविण्यास मदत केल्यास या वर्गांची आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी येथे केले.भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या अंधेरी (पूर्व) येथील मुख्यालयात पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र मत्स्योद्योग, दुग्धव्यवसाय व फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. संत्री, द्राक्ष, केळी, चिकू, अल्फांसो आंबे, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे येथे मोठ्या प्रमाणात होतात. मात्र अन्नप्रक्रिया व पॅकेजिंग अभावी अंदाजे ३० टक्के फळे व भाज्या वाया जातात. पॅकेजिंग क्षेत्राने नवीनतम डिझाईन व तांत्रिक ज्ञानाच्या मदतीने ही नासाडी थांबविण्यासाठी तसेच फळांचे शेल्फ-लाइफ वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.भारतीय पॅकेजिंग उद्योगाने ‘परवडण्याजोगे गुणवत्तापूर्ण’ पॅकेजिंग निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांनी या वेळी केले. पुढील ५० वर्षांमध्ये भारत संपूर्ण विकसित राष्ट्र असेल, असा सार्थ विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)