शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

भूमाता ब्रिगेडने दर्ग्यातील मजारमध्ये जाऊ नये

By admin | Updated: August 28, 2016 02:13 IST

हाजी अली दर्ग्यातील मजार ए शरीफमध्ये जाण्यास ट्रस्टने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने शुक्रवारी हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रविवारी मजार

मुंबई : हाजी अली दर्ग्यातील मजार ए शरीफमध्ये जाण्यास ट्रस्टने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने शुक्रवारी हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रविवारी मजार दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र उच्च न्यायालयाने स्वत:च्या आदेशावर सहा आठवड्यांची स्थगिती दिल्याने देसार्इंनी रविवारी मजार दर्शन करून या आदेशाचा अवमान करू नये, असे आवाहन हाजी अली सबके लिए या संघटनेच्या संस्थापक फिरोज मिठीबोरीवाला यांनी केले आहे.हाजी अली दर्ग्यातील मजारमध्ये जाण्यास घातलेली बंदी हटवण्यात यावी, यासाठी २०१२ पासून संघटना लढत आहेत. शुक्रवारी उच्च न्यायालयाने बंदी हटवल्याने महिलांचा विजय झाला. मात्र उच्च न्यायालयाने ट्रस्टला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळावी म्हणून या आदेशावर सहा आठवडे स्थगिती दिली आहे. त्यामुळे अद्याप संघटनेच्या महिलांनीही मजारमध्ये प्रवेश केलेला नाही. तृप्ती देसार्इंनीही उच्च न्यायालयच्या आदेशाचा आदर करत रविवारी मजारमध्ये प्रवेश करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. त्यांनी तसे केल्यास आमची मेहनत वाया जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत लागेल. त्यामुळे देसार्इंनी तेथे जाऊ नये, असे आवाहन हाजी अली सब के लिए संघटनेचे संस्थापक फिरोज मिठीबोरीवाला यांनी केले आहे.सर्वोच्च न्यायालयात अपिलात जाण्याबाबत ट्रस्टमध्ये संभ्रम- उच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५ आणि २५ चा आधार घेत हाजी अली ट्रस्टने महिलांना मजार दर्शनाची घातलेली बंदी राज्यघटनेविरुद्ध ठरवली. तसेच पुरुष संताच्या मजारला महिलांनी स्पष्ट करणे, हे इस्मालममध्ये महापाप आहे, असा ट्रस्टचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळला. २०१२ मध्ये घातलेली बंदी धर्माचा गाभा असूच शकत नाही आणि ट्रस्ट ते सिद्ध करण्यास अपयशी ठरली आहे, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले. - उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाण्यासाठी ट्रस्टला सहा आठवड्यांची मुदत मिळाली असली तरी निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की नाही, याबाबत विश्वस्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि पुन्हा निर्णय महिलांच्याच बाजूने लागला तर देशात ज्या दर्ग्यांची दारे महिलांसाठी बंद आहेत, त्या दर्ग्यांनाही नाईलाजास्तव महिलांना प्रवेश द्यावा लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व दर्ग्यांना लागू होईल. त्यामुळे विश्वस्तांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.