शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

भूमाता ब्रिगेडने दर्ग्यातील मजारमध्ये जाऊ नये

By admin | Updated: August 28, 2016 02:13 IST

हाजी अली दर्ग्यातील मजार ए शरीफमध्ये जाण्यास ट्रस्टने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने शुक्रवारी हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रविवारी मजार

मुंबई : हाजी अली दर्ग्यातील मजार ए शरीफमध्ये जाण्यास ट्रस्टने घातलेली बंदी उच्च न्यायालयाने शुक्रवारी हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रविवारी मजार दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र उच्च न्यायालयाने स्वत:च्या आदेशावर सहा आठवड्यांची स्थगिती दिल्याने देसार्इंनी रविवारी मजार दर्शन करून या आदेशाचा अवमान करू नये, असे आवाहन हाजी अली सबके लिए या संघटनेच्या संस्थापक फिरोज मिठीबोरीवाला यांनी केले आहे.हाजी अली दर्ग्यातील मजारमध्ये जाण्यास घातलेली बंदी हटवण्यात यावी, यासाठी २०१२ पासून संघटना लढत आहेत. शुक्रवारी उच्च न्यायालयाने बंदी हटवल्याने महिलांचा विजय झाला. मात्र उच्च न्यायालयाने ट्रस्टला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळावी म्हणून या आदेशावर सहा आठवडे स्थगिती दिली आहे. त्यामुळे अद्याप संघटनेच्या महिलांनीही मजारमध्ये प्रवेश केलेला नाही. तृप्ती देसार्इंनीही उच्च न्यायालयच्या आदेशाचा आदर करत रविवारी मजारमध्ये प्रवेश करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. त्यांनी तसे केल्यास आमची मेहनत वाया जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत लागेल. त्यामुळे देसार्इंनी तेथे जाऊ नये, असे आवाहन हाजी अली सब के लिए संघटनेचे संस्थापक फिरोज मिठीबोरीवाला यांनी केले आहे.सर्वोच्च न्यायालयात अपिलात जाण्याबाबत ट्रस्टमध्ये संभ्रम- उच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५ आणि २५ चा आधार घेत हाजी अली ट्रस्टने महिलांना मजार दर्शनाची घातलेली बंदी राज्यघटनेविरुद्ध ठरवली. तसेच पुरुष संताच्या मजारला महिलांनी स्पष्ट करणे, हे इस्मालममध्ये महापाप आहे, असा ट्रस्टचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळला. २०१२ मध्ये घातलेली बंदी धर्माचा गाभा असूच शकत नाही आणि ट्रस्ट ते सिद्ध करण्यास अपयशी ठरली आहे, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले. - उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपीलात जाण्यासाठी ट्रस्टला सहा आठवड्यांची मुदत मिळाली असली तरी निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की नाही, याबाबत विश्वस्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि पुन्हा निर्णय महिलांच्याच बाजूने लागला तर देशात ज्या दर्ग्यांची दारे महिलांसाठी बंद आहेत, त्या दर्ग्यांनाही नाईलाजास्तव महिलांना प्रवेश द्यावा लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व दर्ग्यांना लागू होईल. त्यामुळे विश्वस्तांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.