शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच

By admin | Updated: June 17, 2016 03:08 IST

वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात यावा, अशी केस अर्जदाराने बनवली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ८४० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी

मुंबई : वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात यावा, अशी केस अर्जदाराने बनवली नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ८४० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास नकार दिला. या आधी पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन नाकारला होता.छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असला तरी न्या. पी.एन. देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला आवश्यक असेल तेव्हा भुजबळांना शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचे निर्देश दिले.उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक व्याधी भुजबळांना असल्याने त्यांना यावर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल करायचे आहे. त्याकरिता त्यांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाकडे केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या नऊ डॉक्टरांच्या पॅनलने छगन भुजबळांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. या वैद्यकीय अहवालात अनेक त्रुटी असल्याचे अ‍ॅड. देसाई यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले. चाचण्यांची वेळ आणि भुजबळांची जन्म तारीख वेगळी टाकली असल्याचे अ‍ॅड. देसाई यांनी न्या. देशमुख यांना सांगितले. त्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रुग्णालयातील मशिन्समधील बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ईसीजी चाचणीची वेळ आणि भुजबळ यांच्या जन्म तारखेमध्ये बदल झाला, असे स्पष्टीकरण खंडपीठाला दिले. न्या. देशमुख यांनी हे स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे सांगितले.‘तपास यंत्रणेचे स्पष्टीकरण पुरेसे नाही. मात्र अर्जदारावर असलेले आरोप गंभीर आहेत. तसेच त्यांच्या पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) अंतर्गत नोंदण्यात आलेल्या गुन्ह्यांचा अद्याप तपास पूर्ण झाला नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येत आहे,’ असे न्या. देशमुख यांनी म्हटले. (प्रतिनिधी)आरोप गंभीर असल्याचे कारणयापूर्वी भुजबळांनी जामिनासाठी पीएमएलएकडे अर्ज केला होता. विशेष न्यायालयानेही त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, असे म्हणत जामीन फेटाळला होता. त्यामुळे भुजबळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नाही.