शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

भिवंडीत आज रिक्षाबंद

By admin | Updated: March 7, 2017 03:19 IST

भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला

भिवंडी : बसचालकाला आणि वाहतूक पोलिसाला मारहाण करून वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने या रिक्षाबंदच्या इशाऱ्याने पालक धास्तावले होते. मात्र, अन्य संघटनांनी दहावीचा विचार करून या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोंडीत भर घालणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या, कागदपत्रे सोबत नसलेल्या, गणवेश-बॅजचा नियम न पाळणाऱ्या आणि बसचालक, पोलिसांवरच हात उगारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच त्यांनी नल्ला रिक्षांवर व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली आणि आम्ही नियमानुसार रिक्षा चालवत असून आम्हाला कारवाईने हैराण केले जात असल्याचा आरोप भिवंडी तालुका रिक्षाचालक-मालक महासंघाने केला आणि बंदची हाक दिली. दहावी परीक्षेच्या दिवशीच बंद पाळल्यास आपल्या मागण्या मान्य होतील, या उद्देशाने आंदोलनासाठी तो दिवस निवडण्यात आला.भिवंडीत नल्ला रिक्षांची संख्या वाढली असून त्यावर आरटीओ व स्थानिक वाहतूक पोलीस कठोरपणे कारवाई करीत नाहीत. महासंघाने वाहतूक शाखा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे रिक्षा स्टॅण्ड व इतर मागण्या करून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही रिक्षाचालक ड्रेस, बॅज, परमिट व कागदपत्रे बाळगत असूनही त्यांच्यावर कारवाई केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असा दावा संघटनेने केला आहे.भिवंडीतील जय महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर, रिक्षाचालकांकडून हल्ले झाल्याने वाहतूक विभाग सक्तीने कारवाई करीत आहे. यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडे पोलीस दुर्लक्ष, दुजाभाव करीत आहेत. शहरातील काही पुढारी, पोलीस व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नल्ला रिक्षा असल्यानेच वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना अभय देत आहेत. बऱ्याच नल्ला रिक्षा सायंकाळी ४ ते सकाळी ९पर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अधिकृत रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडून त्यांचे नुकसान होते. (प्रतिनिधी)>निवडणुकांच्या तोंडावरच बंदची आठवण का? मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून काही संघटना बंदमध्ये सामील होणार नाहीत. निवडणुका जवळ आल्या की, दर पाच वर्षांनी असा बंद पुकारण्याची आठवण का होते, असा प्रश्न विचारत काही रिक्षाचालकांनी संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.