शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भिवंडीत आज रिक्षाबंद

By admin | Updated: March 7, 2017 03:19 IST

भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला

भिवंडी : बसचालकाला आणि वाहतूक पोलिसाला मारहाण करून वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने या रिक्षाबंदच्या इशाऱ्याने पालक धास्तावले होते. मात्र, अन्य संघटनांनी दहावीचा विचार करून या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोंडीत भर घालणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या, कागदपत्रे सोबत नसलेल्या, गणवेश-बॅजचा नियम न पाळणाऱ्या आणि बसचालक, पोलिसांवरच हात उगारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच त्यांनी नल्ला रिक्षांवर व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली आणि आम्ही नियमानुसार रिक्षा चालवत असून आम्हाला कारवाईने हैराण केले जात असल्याचा आरोप भिवंडी तालुका रिक्षाचालक-मालक महासंघाने केला आणि बंदची हाक दिली. दहावी परीक्षेच्या दिवशीच बंद पाळल्यास आपल्या मागण्या मान्य होतील, या उद्देशाने आंदोलनासाठी तो दिवस निवडण्यात आला.भिवंडीत नल्ला रिक्षांची संख्या वाढली असून त्यावर आरटीओ व स्थानिक वाहतूक पोलीस कठोरपणे कारवाई करीत नाहीत. महासंघाने वाहतूक शाखा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे रिक्षा स्टॅण्ड व इतर मागण्या करून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही रिक्षाचालक ड्रेस, बॅज, परमिट व कागदपत्रे बाळगत असूनही त्यांच्यावर कारवाई केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असा दावा संघटनेने केला आहे.भिवंडीतील जय महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर, रिक्षाचालकांकडून हल्ले झाल्याने वाहतूक विभाग सक्तीने कारवाई करीत आहे. यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडे पोलीस दुर्लक्ष, दुजाभाव करीत आहेत. शहरातील काही पुढारी, पोलीस व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नल्ला रिक्षा असल्यानेच वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना अभय देत आहेत. बऱ्याच नल्ला रिक्षा सायंकाळी ४ ते सकाळी ९पर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे अधिकृत रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडून त्यांचे नुकसान होते. (प्रतिनिधी)>निवडणुकांच्या तोंडावरच बंदची आठवण का? मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून काही संघटना बंदमध्ये सामील होणार नाहीत. निवडणुका जवळ आल्या की, दर पाच वर्षांनी असा बंद पुकारण्याची आठवण का होते, असा प्रश्न विचारत काही रिक्षाचालकांनी संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.