शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या निमंत्रणासाठी भाजपाचा भीमरथ

By admin | Updated: October 6, 2015 03:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर रोजी इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर रोजी इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. भूमिपूजन सोहळा आणि त्यानंतर वांद्रा-कुर्ला संकुलातील जाहीर सभेचे आमंत्रण देण्यासाठी भाजपाने भीमरथ तयार केला आहे. मुंबईतील १४० वस्त्यांमध्ये हा भीमरथ फिरणार आहे. भूमिपूजन समारंभाला लाखो नागरिकांनी उपस्थित राहावे अशी भाजपाची संकल्पना असून, त्याचे आमंत्रण घराघरांत जाऊन देण्यासाठी भीमरथ तयार करण्यात आला आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी सोमवारी या रथाचे उद्घाटन केले. भाजपाचे आ. भाई गिरकर यांच्या नेतृत्वाखाली १० आॅक्टोबरपर्यंत मुंबईतील कानाकोपऱ्यांत हा रथ दौडणार आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असून, या दिवशी गेल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मूर्त स्वरूप येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधी जागेचे तर कधी कायद्याचे तर कधी चर्चेचे अडथळेच निर्माण केले. पण भाजपा सरकारने निष्ठेने पहिल्या एका वर्षातच स्मारकाचा मार्ग मोकळा केल्याचे आशिष शेलार म्हणाले. भीमरथाच्या नावाखाली भाजपाकडून फसवणूक - मलिक भाजपा हा रथाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा पक्ष आहे. पहिल्यांदा रामरथ काढून लोकांची फसवणूक केली. आता भीमरथ काढून लोकांची फसवणूक करण्याचा नवा कार्यक्रम आखण्यात आल्याची टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. या स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. बिहार निवडणुकीच्या तोंडावर ११ तारखेला स्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट घालण्यात आल्याची टीका मलिक यांनी केली. बाबासाहेबांना नाकारणाऱ्यांनी टीका करू नये - भाई गिरकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारणाऱ्यांनी भाजपावर टीका करू नये. या भव्यदिव्य स्मारकाचा ऐतिहासिक सोहळा मुंबईत होतोय, त्याच्या निमंत्रणासाठी हा भीमरथ आहे. आघाडीच्या काळात केवळ स्मारकासमोरील अडचणींचा पाढाच वाचण्यात आला. कधी एनटीपीसी तर पर्यावरणाची अडचण सांगण्यात आली; पण भाजपा सरकारने वर्षभरात सर्व अडचणींवर मात केल्याचे गिरकर म्हणाले.