शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर निवडणूक तारखा उद्या जाहीर?

By admin | Updated: July 14, 2017 03:44 IST

येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

धीरज परब । लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मतदारयादी तयार करण्याच्या सावळ्यागोंधळामुळे अंतिम यादीची प्रसिध्दी लांबली असताना त्याची वाट न पाहता येत्या शनिवारी, १५ जुलैला मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली, तर आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रचारासाठी जेमतेम २५ दिवस मिळणार असल्याने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्या, मतदान केंदे्र आदी तयारीसाठी २ जूनला राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यक्रम दिला होता. २५ जूनला प्रारुप प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे, १ जुलैपर्यंत हरकती, ७ जुलैला प्रभागनिहाय अंतिम याद्या-मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि ११ जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द करणे आवश्यक होते. परंतु मीरा-भार्इंदर व ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी घातलेला घोळ, पालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यांमधील सावळ््यागोंधळामुळे हरकतींची तारीख ४ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. पुन्हा पालिकेने मुदतवाढ घेतल्याने आयोगाने ६ जुलैपर्यंत हरकती-सूचना आणि २० जुलैला प्रभागनिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिध्द करण्याचे जाहीर केले. ही अनागोंदी व गैरप्रकार यामुळे संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रकच कोलमडून पडले. पण त्यातील नागरिकांच्या सहभागाचे काम पूर्ण झाल्याने यादी आयोगाकडे पाठवण्याची तांत्रिक बाब पूर्ण होईपर्यंत न थांबता निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेची महापौर निवडणूक २८ आॅगस्टपर्यंत व्हायला हवी. त्यासाठी किमान दहा दिवस अगोदर मतदान व्हायला हवे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आठवडा, त्यांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप आणि अंतिम यादी यासाठी किमान पंधरवडा द्यावा लागतो. नंतर प्रचारासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी आणि मतदान, मोजणी यांचा कालावधी पाहता १५ जुलैला आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी स्पष्ट होणार, त्यात प्रभागाचा आकार दुप्पट झाला आहे. त्यांच्या रचनेत बदल झाल्याने, प्रचाराचे दिवस कमी होण्याच्या शक्यतेने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.>आचारसंहिता लागताच उमेदवारी अर्जआचारसंहिता लागू होताच भाजपातील इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटले जातील असे भाजपाचे निवडणूक प्रभारी खासदार कपील पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हेही प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पाटील यांनी गुरूवारी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इच्छउकांची संख्या खूप असल्याने बंडाळीची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्यासाठी मेहनत करा, अशी समज उपस्थितांना दिली. पक्षाने प्रत्येक प्रभागात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी दिली जाईल, असे पाटील म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन, गटनेते शरद पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते. >१८ आॅगस्टला मतदान? : १२ व १३ आॅगस्ट रोजी शनिवार-रविवार, तर १५ ला स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. १७ रोजी पारसी नववर्षाची सुट्टी आहे. २५ पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. २८ आॅगस्टला सोमवार येत असल्याने महापौरपदाची निवडणूक त्याचदिवशी किंवा २४ आॅगस्टपर्यंत पार पाडावी लागेल. स्वातंत्र्यदिनाच्या बंदोबस्ताच्या दोन दिवसांच्या काळात मतदान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे १८ आॅगस्टला मतदान होण्याची दाट शक्यता आहे.