शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सावधान.. सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविली तर सहा महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: June 22, 2015 01:56 IST

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई, श्याम मानव यांची माहिती.

अकोला : फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविणारे संदेश पाठविले जातात. या संदेशांमधून भीती दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत मोडत असून, असे संदेश पाठविणार्‍यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन रविवारी अकोल्यात करण्यात आले होते. या बैठकीसाठी श्याम मानव आले असता, त्यांनी 'लोकमत'शी बातचीत केली. जागृत हनुमानाचे एखादे छायाचित्र दहा जणांना पाठवा, एखादी देवी जागृत असून, नवसाला पावणारी आहे, हे छायाचित्र शेअर करा व २५ जणांना पाठवा अन्यथा नुकसान होईल, अशी भीती दाखविणारे व अंधश्रद्धा पसरविणारे अनेक संदेश, फेसबुक व व्हॉट्स अँपवर धडकत असतात. हे बेकायदेशीर असून, असे संदेश पाठविणार्‍यास तुरूंगाची हवा खावी लागू शकते, अशी माहिती प्रा. श्याम मानव यांनी यावेळी दिली.प्रश्न : कायदा लागू झाल्यानंतरही कारवाई प्रभावीरीत्या होत नाही? -कायदा लागू होऊन १ वर्ष १0 महिने झाले आहेत. यादरम्यान या कायद्यांतर्गत १४0 प्रकरणे दाखल झाली आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता पोलिसांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याकरिता आम्ही राज्यभरात पोलीस अधिकार्‍यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देत आहोत. पोलिसांना कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. आता विदर्भातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रश्न : कायद्याचा प्रचार-प्रसार पूर्ण झाला, असे वाटते काय? -कायद्याचा प्रचार व प्रसार सुरू आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर ३५ जिल्ह्यांत ३८ सभा घेण्यात आल्या. या सभांना भरभरून प्रतिसाद होता. ३५७ शाळांमध्ये व्याख्याने झाली. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये १३0 वक्ते तयार करण्यात आले. हे वक्तेही या कायद्याचा व जादूटोणापासून होणार्‍या नुकसानाबाबत नागरिकांना जागरूक करीत आहेत. आमचे काम सुरूच आहे. प्रश्न: कायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात लागू झाला होता. आता राज्यात सत्ताबदल होऊन हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे पक्ष भाजप व शिवसेनेची सत्ता आली आहे. हे सरकार कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे करीत आहे काय? -हा कायदा जरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात लागू झाला होता. तरी त्यावेळेसही भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने कायदा लागू करण्यासाठी अनुमती दिली होती. या कायद्याला बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेचा विरोध होता. मात्र, त्यानंतरही भाजपने या कायद्याला पाठिंबा दर्शविला. सत्ता आल्यानंतरही दोन्ही पक्षाचे सरकार संपूर्ण सहकार्य करीत आहे. त्यामुळेच मी राज्यात पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देत आहे. कुणालाही माणसे मरावी, असे वाटत नाही. हा कायदा माणसं जगविणारा आहे. भाजप व सेनेच्या नेत्यांना अंधश्रद्धेमुळे माणसं मरावी असे कसे वाटेल. प्रश्न : कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय आवश्यक आहे? -कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांना या कायद्याची संपूर्ण माहिती असणे व त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तेच आम्ही करीत आहोत.