शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

समतोल विकासासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही उपाय

By admin | Updated: December 31, 2014 01:04 IST

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविताना केळकर समितीने शेतकऱ्यांची आजची दैनावस्था दूर करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत.

नागपूर : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविताना केळकर समितीने शेतकऱ्यांची आजची दैनावस्था दूर करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांंवरील अहवाल नुकताच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला. समितीने या अहवालात प्रादेशिक असमतोल दूर करण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुचवितानाच मागास भागातील शेतकऱ्यांच्या दैनावस्थेकडेही लक्ष वेधले; तसेच ही अवस्था दूर करण्यासाठी काही उपायही सुचविले आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादक, त्यांना मिळणारा मोबदला, त्यातून निर्माण होणारे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न आदींचा समावेश आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबीयांची वाताहत होत असल्याने त्यांच्या साक्षर मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत विचार यात मांडण्यात आला आहे. नापिकीसाठी अपुरे सिंचन हे महत्त्वाचे कारण असल्याने किमान १० टक्के क्षेत्र तरी सिंचनाखाली यावे, पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आगामी तीन वर्षांकरिता शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबास आर्थिक मदत, कृषिपंपांना तत्काळ वीजजोडणी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव आणि पीकहानीसाठी नुकसान भरपाई आदींकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.रोजगाराअभावी अनेक शिक्षित शेतकरी बेरोजगार आहेत. त्यांना स्वयंरोजगारासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठांमध्ये सध्या केवळ संशोधन व शिक्षण देण्याची प्रक्रिया चालते. या कार्यक्रमांना बी-बियाण्यांचे उत्पादन व विक्रीची जोड दिल्यास शेतकरी व विद्यापीठ यांच्यात खऱ्या अर्थाने दुवा साधला जाईल. कृषी विद्यापीठांशी निगडित विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही समितीने व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)