शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

लेखी आश्वासनाशिवाय आमदारांचे उपोषण मागे

By admin | Updated: October 20, 2016 01:52 IST

बेमुदत उपोषण करण्याची घोषणा आमदार दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी केली होती.

मुंबई : विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना अनुदान देण्याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा आमदार दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी केली होती. मात्र उपोषणाच्या दुसऱ्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि दोनही आमदारांनी कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे संबंधित आमदारांनी शिक्षकांना न्याय देण्यासाठी हे उपोषण केले, की ही एक स्टंटबाजी होती, अशी चर्चा शिक्षणक्षेत्रात रंगली आहे.आमदार दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांनी आझाद मैदानात सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. अनुदानासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करा आणि औरंगाबाद प्रकरणातील शिक्षकांवरील ३०७ कलम रद्द करा, या आमदारांच्या प्रमुख मागण्या होत्या. सोमवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आझाद मैदानात येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी त्याच दिवशी दुपारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या चर्चेत जाचक अटी शिथिल करून निर्दोष शिक्षकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन तावडे यांनी मोते यांना दिले. या वेळी तावडे यांनी उपोषणकर्त्या आमदारांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्या आमदारांनी घेतला.राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी आझाद मैदानात जाऊन संबंधित आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तर सायंकाळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मैदानात जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. या वेळीही आमदारांनी लेखी आश्वासनाचा हट्ट कायम ठेवला होता. मात्र सायंकाळनंतर आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळाली आणि काही वेळेत चक्रे फिरली. दोन दिवसांपासून जी आश्वासने तावडे देत होते, त्याचीच पुनर्वाच्यता मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही. तरीही दोनही आमदारांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमदारांनी नेमके आंदोलन करण्याचा उद्देश काय होता, यावर चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)।आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत १०० टक्के निकालाची जाचक अट शिथिल करण्याचे आश्वासन मिळाले. शिवाय अनुदानासाठी जाचक ठरणाऱ्या इतर मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा झाली. या सर्व आश्वासनांवरील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होतील. या ठोस आश्वासनांमुळेच आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.