शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात पुन्हा एका शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

By admin | Updated: August 17, 2016 14:13 IST

आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने पुन्हा हल्ला चढवला आहे.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १७ -  आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर त्या अस्वलाने पुन्हा हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर पवार (४५) रा. मोई असे जखमीचे नाव आहे. अस्वलाचा हा तिसरा हल्ला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मोई व माणिकवाडा या दोन गावातील शेतकऱ्यांवर अस्वल व तिच्या दोन पिलांनी हल्ला चढविला होता.
१५ दिवसांपूर्वी अशाचप्रकारे एका शेतकऱ्यावर अस्वलाने दुसऱ्यांदा हल्ला केला होता. यामुळे संतप्त होऊन  सुमारे २५०० नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना चार तास वेठीस धरले होते. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्या अस्वलाची दहशत घालविण्याच्या  तात्काळ सूचना वनविभागाच्या येथील अधिकाऱ्यांना दिल्या
होत्या. दि. ४ आॅगस्टपासून एसआरपीच्या २२ जवानांनी मोई, माकिणवाडा, कोल्हाकाळी जंगलात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. १५ आॅगस्टपर्यंत अस्वलाचा कुठेही शोध लागला नाही. आता अस्वल या भागात नाही. आता दहशत संपली, असे गृहीत धरुन कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्यात आले होते. अस्वलाची भीती नसल्याचे हेरुन  ज्ञानेश्वर पवार हे दुसऱ्याच दिवशी रात्री शेतात जागलीला गेले.  वन्यप्राणी त्यांच्या शेतातील भुईमुंगाची नासाडी करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अंधार असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. ज्ञानेश्वरने रानडुक्कर समजून  हाकायचा प्रयत्न करताच दबा धरून बसलेल्या अस्वलाने एकाएकी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये  त्यांना त्यांच्या पाय, छाती व कंबरेच्या भागाचे लचके तोडून गंभीर जखमी केले.
आरडाओरडा केल्यावर परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी ज्ञानेश्वरची अस्वलाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार यांना दिली.  त्यांनी रुग्णवाहिका पाठवून  जखमीला
अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता हलविले.
ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी मोई गावात रात्रीच भेट देवून परिस्थिती व शांततामय वातावरण कायम ठेवण्यास यश मिळविले. या हल्ल्यामुळे मोई गावात पुन्हा एकदाअस्वलाची दशहत निर्माण झाली आहे.    
 
भुईमूगाचे पीक धोक्यात
खरीपातील भुईमूग पीक वनप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्रीला नाईलाजास्तव शेतकऱ्यांना जागलीसाठी जावे लागत आहे.  महिनाभरापासून अस्वल व तिच्या दोन पिलांनी या शिवारात चांगलीच दहशत माजविली आहे. परिणामी शेतकरी शेतावर वा जागलीसाठी जाण्यास कचरत आहे.