शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

वर्ध्यात पुन्हा एका शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

By admin | Updated: August 17, 2016 14:13 IST

आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने पुन्हा हल्ला चढवला आहे.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १७ -  आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर त्या अस्वलाने पुन्हा हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर पवार (४५) रा. मोई असे जखमीचे नाव आहे. अस्वलाचा हा तिसरा हल्ला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मोई व माणिकवाडा या दोन गावातील शेतकऱ्यांवर अस्वल व तिच्या दोन पिलांनी हल्ला चढविला होता.
१५ दिवसांपूर्वी अशाचप्रकारे एका शेतकऱ्यावर अस्वलाने दुसऱ्यांदा हल्ला केला होता. यामुळे संतप्त होऊन  सुमारे २५०० नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना चार तास वेठीस धरले होते. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्या अस्वलाची दहशत घालविण्याच्या  तात्काळ सूचना वनविभागाच्या येथील अधिकाऱ्यांना दिल्या
होत्या. दि. ४ आॅगस्टपासून एसआरपीच्या २२ जवानांनी मोई, माकिणवाडा, कोल्हाकाळी जंगलात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. १५ आॅगस्टपर्यंत अस्वलाचा कुठेही शोध लागला नाही. आता अस्वल या भागात नाही. आता दहशत संपली, असे गृहीत धरुन कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्यात आले होते. अस्वलाची भीती नसल्याचे हेरुन  ज्ञानेश्वर पवार हे दुसऱ्याच दिवशी रात्री शेतात जागलीला गेले.  वन्यप्राणी त्यांच्या शेतातील भुईमुंगाची नासाडी करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अंधार असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. ज्ञानेश्वरने रानडुक्कर समजून  हाकायचा प्रयत्न करताच दबा धरून बसलेल्या अस्वलाने एकाएकी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये  त्यांना त्यांच्या पाय, छाती व कंबरेच्या भागाचे लचके तोडून गंभीर जखमी केले.
आरडाओरडा केल्यावर परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी ज्ञानेश्वरची अस्वलाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार यांना दिली.  त्यांनी रुग्णवाहिका पाठवून  जखमीला
अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता हलविले.
ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी मोई गावात रात्रीच भेट देवून परिस्थिती व शांततामय वातावरण कायम ठेवण्यास यश मिळविले. या हल्ल्यामुळे मोई गावात पुन्हा एकदाअस्वलाची दशहत निर्माण झाली आहे.    
 
भुईमूगाचे पीक धोक्यात
खरीपातील भुईमूग पीक वनप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्रीला नाईलाजास्तव शेतकऱ्यांना जागलीसाठी जावे लागत आहे.  महिनाभरापासून अस्वल व तिच्या दोन पिलांनी या शिवारात चांगलीच दहशत माजविली आहे. परिणामी शेतकरी शेतावर वा जागलीसाठी जाण्यास कचरत आहे.