शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

मनसबदारांची लढाई

By admin | Updated: January 20, 2017 02:11 IST

महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभागांच्या फेररचनेमुळे सर्वच प्रस्थापितांना हादरे बसले.

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभागांच्या फेररचनेमुळे सर्वच प्रस्थापितांना हादरे बसले. काही वॉर्डमधील प्रभागांचे विस्तारीकरण झाले, तर काही प्रभागांचे दोन प्रभागांत विभाजन झाले. कुर्ला पश्चिम एल वॉर्डातील प्रभाग क्रमांक १६२ मध्ये हीच अवस्था आहे. या प्रभागात विजयासाठी पाच ते सहा हजार मतांची आवश्यकता असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. परिणामी प्रभागात सहा हजारी मनसबदारीसाठी लढाई रंगणार आहे.कुर्ला पश्चिमेतील नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या नवीन नाही. यामुळे याची सवय झाल्याचे स्थानिक सांगतात. शिवाय झोपडपट्टी जास्त प्रमाणात असल्याने परिसराचा विकासदेखील शून्य आहे. अशा परिस्थितीत फेररचनेमुळे प्रभाग लहान झाला आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत हा प्रश्न चर्चिला जाणार यात शंका नाही. फेररचनेनुसार प्रभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता सध्या सुमारे २८ हजार ५०० लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे ५० टक्के मतदान करणार आहेत. यातून विजयासाठी पाच ते सहा हजार मतांची आवश्यकता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यामुळे पाच ते सहा हजार मतांसाठी एका विशिष्ट नगरात आपले वर्चस्व निर्माण करून विजय सहज शक्य आहे.प्रभागात निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांसह हिंदू, मुस्लीम लोकवस्ती आहे. प्रभागातील सत्ताधारी पक्षातील नेत्याचा विचार करता हा पल्ला पार करणे सहज शक्य आहे. मात्र मताचा विजयी आकडा कमी असल्याने उमेदवार गाफील राहिल्यास निकाल पालटेल, असा अंदाज स्थानिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)