शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

१ ऑगस्टला रात्रशाळांचा मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा'

By admin | Updated: July 26, 2016 20:21 IST

रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिचे औच्युतै साधत या मोर्चाची सुरवात लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळ्याला अभिवादन करुन सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. असे छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी लोकमतला बोलताना सांगितले. रात्रशाळांना मुक्त शाळेंचा पर्याय देण्याची योजना शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्याला या कष्टकरी वि़द्यार्थ्यांचा विरोध आहे. दिवसांच्या शाळांचे संचमान्यतेचे निकष रात्रशाळा आणि रात्र ज्युनिअर कॉलेजांना लावल्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने सरप्लस झाले आहेत. महत्वाच्या विषयांना शिक्षकच उरलेले नाहीत. असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगीतले. पुढे बोलताना ते म्हणाले, मंत्रालयावरील 'बॅटरी मोर्चा'च्या वेळी रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर, आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, मोर्च्याचं नेतृत्व करणार आहेत. मुक्त शाळांचा पर्याय म्हणजे रात्रशाळेत आणि नाईट ज्युनिअर कॉलेजात जाऊन शिकण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, ३० वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा असाच आझाद मैदानावर पहिला बॅटरी मोर्चा निघाला होता. येत्या सोमवारी १ ऑगस्टला शिक्षणाच्या स्वराज्यासाठी टिळक पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. अधिकाअधिक विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, सर्वांना सोबत घेऊन या! असे आव्हान छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी केले आहे.